शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
2
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
3
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
6
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
7
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
8
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
9
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
10
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
11
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
12
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
13
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
14
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
15
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
16
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
17
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
19
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
20
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी

नाफेडच्या सबएंजटांनी लावली शेतकऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:02 IST

नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले.

ठळक मुद्देतूर, हरभऱ्याची खरेदी : निकटस्थांसह व्यापाऱ्यांचा फायदा; अमरावती, अचलपूर तालुक्यात गुन्हे नोंदविले, चांदूरबाजार रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले. निकटस्थांना व व्यापाऱ्यांना फायदा देण्यासाठी केलेली हेरफेर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच ओळखून गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याने या ठगबाजांच्या मोठ्या साखळीचा उलगडा होणार आहे.गतवर्षीच्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. नाफेडच्या केंद्रावरही मोठ्या प्रमाणात हमीभावाने खरेदी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील गोदामे पूर्ण भरली असल्याने यंदा केंद्रांवर खरेदीची गती वाढलीच नाही. त्यामुळे आॅनलाइन नोंदणी केलेले अर्धेअधिक शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले. त्यामुळे निकटस्थांना लाभ देण्यासाठी व अर्थपूर्र्ण संबंधातून व्यापाऱ्यांची तूर विकली जावी, यासाठी सबएजंट संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाºयांना हाताशी धरून खेळी केली.शेतकऱ्यांना यामध्ये एसएमएस न पाठविता क्रमवारी डावलून व नोंदणी रजिस्टरवर खोडतोड करून काही ठिकाणी जागा कोऱ्या ठेवून संबंधितांना फायदा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नोंदणी केलेला शेतकरी वंचित राहिल्याने काही शेतकºयांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये सद्यस्थितीत अचलपूर व अमरावती तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी आणि शेतकºयांच्या क्रमवारीमध्ये गोंधळ असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला. याप्रकरणी त्यांनी सबएजंट असणाºया आणि दोषी असलेल्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणात पोलिसांनी काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली. मात्र, या प्रकारामुळे शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले आहेत, तर काही शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानापासूनदेखील वंचित राहण्याची शक्यता आहे.शासन अनुदानातही व्यापाऱ्यांना फायदाजिल्ह्यात तुरीची ३६,६९९ व हरभऱ्याची २३,७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीअभावी घरीच पडून राहिला. १५ मेपासून तूर, तर १३ जूनपासून हरभऱ्याची शासन खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टर मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. यामध्येही व्यापारांचाच अधिक फायदा आहे.व्यापाऱ्यांनीच लावला लाखोंचा चुनाखासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा दोन हजारांनी कमी भाव व त्यातही गावागावांत त्यापेक्षा कमी भाव असल्याने काही स्थानिक व्यापाऱ्यांनी गावातून तुरीची खरेदी केली व शेतकऱ्यांच्या नावाआड विक्री केली. मात्र केंद्रावर खरेदीची गती मंदावल्यामुळे खरेदी केलेली तूर विकली जात नसल्याने त्यांनी सबएंजट संस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना हाताशी पकडून जो घोळ केला, तोच आता अंगलट आलेला आहे.शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिलेत. चांदूरबाजारचीही तक्रार आहे. तेथेही चौकशी करण्यात येईल.- अभिजित बांगर जिल्हाधिकारी