शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

नाफेडच्या सबएंजटांनी लावली शेतकऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:02 IST

नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले.

ठळक मुद्देतूर, हरभऱ्याची खरेदी : निकटस्थांसह व्यापाऱ्यांचा फायदा; अमरावती, अचलपूर तालुक्यात गुन्हे नोंदविले, चांदूरबाजार रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले. निकटस्थांना व व्यापाऱ्यांना फायदा देण्यासाठी केलेली हेरफेर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच ओळखून गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याने या ठगबाजांच्या मोठ्या साखळीचा उलगडा होणार आहे.गतवर्षीच्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. नाफेडच्या केंद्रावरही मोठ्या प्रमाणात हमीभावाने खरेदी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील गोदामे पूर्ण भरली असल्याने यंदा केंद्रांवर खरेदीची गती वाढलीच नाही. त्यामुळे आॅनलाइन नोंदणी केलेले अर्धेअधिक शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले. त्यामुळे निकटस्थांना लाभ देण्यासाठी व अर्थपूर्र्ण संबंधातून व्यापाऱ्यांची तूर विकली जावी, यासाठी सबएजंट संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाºयांना हाताशी धरून खेळी केली.शेतकऱ्यांना यामध्ये एसएमएस न पाठविता क्रमवारी डावलून व नोंदणी रजिस्टरवर खोडतोड करून काही ठिकाणी जागा कोऱ्या ठेवून संबंधितांना फायदा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नोंदणी केलेला शेतकरी वंचित राहिल्याने काही शेतकºयांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये सद्यस्थितीत अचलपूर व अमरावती तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी आणि शेतकºयांच्या क्रमवारीमध्ये गोंधळ असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला. याप्रकरणी त्यांनी सबएजंट असणाºया आणि दोषी असलेल्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणात पोलिसांनी काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली. मात्र, या प्रकारामुळे शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले आहेत, तर काही शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानापासूनदेखील वंचित राहण्याची शक्यता आहे.शासन अनुदानातही व्यापाऱ्यांना फायदाजिल्ह्यात तुरीची ३६,६९९ व हरभऱ्याची २३,७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीअभावी घरीच पडून राहिला. १५ मेपासून तूर, तर १३ जूनपासून हरभऱ्याची शासन खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टर मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. यामध्येही व्यापारांचाच अधिक फायदा आहे.व्यापाऱ्यांनीच लावला लाखोंचा चुनाखासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा दोन हजारांनी कमी भाव व त्यातही गावागावांत त्यापेक्षा कमी भाव असल्याने काही स्थानिक व्यापाऱ्यांनी गावातून तुरीची खरेदी केली व शेतकऱ्यांच्या नावाआड विक्री केली. मात्र केंद्रावर खरेदीची गती मंदावल्यामुळे खरेदी केलेली तूर विकली जात नसल्याने त्यांनी सबएंजट संस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना हाताशी पकडून जो घोळ केला, तोच आता अंगलट आलेला आहे.शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिलेत. चांदूरबाजारचीही तक्रार आहे. तेथेही चौकशी करण्यात येईल.- अभिजित बांगर जिल्हाधिकारी