शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 12:48 IST

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची विचारधारा बुडवण्याचं काम केलं, नवनीत राणांची टीका

अमरावती : हनुमान जयंतीनिमित्त बडनेरा येथे सामुहिक हनुमान चालिसा पठणाच्‍या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. राम भगवानने अच्छे अच्छोंका घमंड मिट्टी में मिला दिया, तुम किस खेत की मुली हो.. असा हल्लाबोल राणा यांनी केला.

राज्यात आज हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बडनेरा मार्गावरील एका लॉनमध्ये हनुमान चालिसा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना नवनीत राणा १४ दिवसांच्या तुरुंगवारीची आठवण काढली. हनुमान चालीसा पठण केले म्हणून जेलमध्ये टाकले. त्यांनी मला तुरुंगात टाकलं पण माझा विश्वास ते तोडू शकले नाही, असं म्हणत राणा भावूक झाल्या होत्या.

ज्या कुटुंबात, परिवारात तुम्ही जन्माला आले ते घर तुम्ही सांभाळू शकला नाहीत. ज्या विचारधारेविचारधारेवर तुमचे ४० आमदार निवडून आले ते तुम्ही सांभाळून घेऊ शकला नाहीत. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पानी केलं आणि हिंदू विचारधारा देशात निर्माण केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मेहनतीवर माती टाकण्याचं काम केलं, अशी टीका राणा यांनी केली.

''उद्धव ठाकरेजी तुम्ही मोठ्या परिवारात जन्म जरी घेतला असला तरी भावनागरीब लोकांसाठी आमची आस्था आमच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त आहे''असं राणा म्हणाल्या. जो रामललामध्ये विश्वास ठेवत नाही जो हनुमंतामध्ये विश्वास ठेवत नाही. व जिथे जिथे महाविकास आघाडीची सभा होत आहे, उद्धव ठाकरे यांची भाषणं होत आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला शुद्धीकरण करण्याचं काम करायचं आहे. तसेच त्या परिसरात हनुमान चालिसा पठण सगळ्या लोकांनी केलं पाहिजे, असंही राणा यावेळी म्हणाल्या. 

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंतीAmravatiअमरावती