शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

अचलपुरात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे

By admin | Updated: December 6, 2014 22:38 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.

अमरावती : जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्ह्यातील एकूण १९८१ महसुली गावांत टंचाई जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार सन २०१४-२०१५ यावर्षातील खरीप हंगामातील ज्या गावांची नावे टंचाई म्हणून जाहीर केली आहे त्या गावांमध्ये ५० पैशाच्या आत आणेवारी असल्यामुळे टंचाईची घोषणा करून या गावामध्ये दुष्काळी स्थितीत आवश्यक उपायोजनासुध्दा जाहीर केल्या आहेत. टंचाईग्रस्त तालुकानिहाय गावांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक टंचाईची गावे अचलपूर तालुक्यात १८४ तर सर्वात कमी गावे ९० चांदूररेल्वे तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ चांदूरबाजार तालुक्यातील १७१, चिखलदरा तालुक्यातील १६३, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील १६१, मोर्शी १५६, धारणी १५२, दर्यापूर १५०, अमरावती १४३, वरूड १४०, भातकुली १३७,अंजनगाव सुर्जी १२७, धामणगाव रेल्वे ११२, तिवसा ९५ व चांदूररेल्वेत ९० अशा सुमारे १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली ही गावे क्रमवारीनुसार पाहिल्यास गावांची संख्यानिहाय क्रम असा लागतो. विशेष म्हणजे अमरावती तालुक्यातील तुळजापूर, गावातील जमिन औद्योगिक वसाहतीत गेली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगा येथील शेती शंभर टक्के बुडीत क्षेत्रात गेली आहे. वरूडमधील चांदूरवाडी आणि धारणी तालुक्यातील दुधाणी आदी गावात महसुल विभागाची जमिन नसल्याने ही चार गावे टंचाईमधून वगळण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)