शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

अचलपुरात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे

By admin | Updated: December 6, 2014 22:38 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.

अमरावती : जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्ह्यातील एकूण १९८१ महसुली गावांत टंचाई जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार सन २०१४-२०१५ यावर्षातील खरीप हंगामातील ज्या गावांची नावे टंचाई म्हणून जाहीर केली आहे त्या गावांमध्ये ५० पैशाच्या आत आणेवारी असल्यामुळे टंचाईची घोषणा करून या गावामध्ये दुष्काळी स्थितीत आवश्यक उपायोजनासुध्दा जाहीर केल्या आहेत. टंचाईग्रस्त तालुकानिहाय गावांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक टंचाईची गावे अचलपूर तालुक्यात १८४ तर सर्वात कमी गावे ९० चांदूररेल्वे तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ चांदूरबाजार तालुक्यातील १७१, चिखलदरा तालुक्यातील १६३, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील १६१, मोर्शी १५६, धारणी १५२, दर्यापूर १५०, अमरावती १४३, वरूड १४०, भातकुली १३७,अंजनगाव सुर्जी १२७, धामणगाव रेल्वे ११२, तिवसा ९५ व चांदूररेल्वेत ९० अशा सुमारे १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली ही गावे क्रमवारीनुसार पाहिल्यास गावांची संख्यानिहाय क्रम असा लागतो. विशेष म्हणजे अमरावती तालुक्यातील तुळजापूर, गावातील जमिन औद्योगिक वसाहतीत गेली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगा येथील शेती शंभर टक्के बुडीत क्षेत्रात गेली आहे. वरूडमधील चांदूरवाडी आणि धारणी तालुक्यातील दुधाणी आदी गावात महसुल विभागाची जमिन नसल्याने ही चार गावे टंचाईमधून वगळण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)