शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

अचलपुरात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे

By admin | Updated: December 6, 2014 22:38 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.

अमरावती : जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्ह्यातील एकूण १९८१ महसुली गावांत टंचाई जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार सन २०१४-२०१५ यावर्षातील खरीप हंगामातील ज्या गावांची नावे टंचाई म्हणून जाहीर केली आहे त्या गावांमध्ये ५० पैशाच्या आत आणेवारी असल्यामुळे टंचाईची घोषणा करून या गावामध्ये दुष्काळी स्थितीत आवश्यक उपायोजनासुध्दा जाहीर केल्या आहेत. टंचाईग्रस्त तालुकानिहाय गावांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक टंचाईची गावे अचलपूर तालुक्यात १८४ तर सर्वात कमी गावे ९० चांदूररेल्वे तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ चांदूरबाजार तालुक्यातील १७१, चिखलदरा तालुक्यातील १६३, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील १६१, मोर्शी १५६, धारणी १५२, दर्यापूर १५०, अमरावती १४३, वरूड १४०, भातकुली १३७,अंजनगाव सुर्जी १२७, धामणगाव रेल्वे ११२, तिवसा ९५ व चांदूररेल्वेत ९० अशा सुमारे १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली ही गावे क्रमवारीनुसार पाहिल्यास गावांची संख्यानिहाय क्रम असा लागतो. विशेष म्हणजे अमरावती तालुक्यातील तुळजापूर, गावातील जमिन औद्योगिक वसाहतीत गेली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगा येथील शेती शंभर टक्के बुडीत क्षेत्रात गेली आहे. वरूडमधील चांदूरवाडी आणि धारणी तालुक्यातील दुधाणी आदी गावात महसुल विभागाची जमिन नसल्याने ही चार गावे टंचाईमधून वगळण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)