शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कर्जमाफीसाठी उजाडणार मार्च-एप्रिल, शेतक-यांची दिवाळी गोड नाहीच, मंत्र्यांच्या दाव्यांना किशोर तिवारींचा सुरुंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 5:53 PM

दस-यानंतर कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होईल, शेतकºयांची दिवाळी गोड होईल, असा दावा राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार करीत आहेत. परंतु, सरकारचाच एक घटक असलेल्या शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मात्र मंत्र्यांच्या या दाव्यांना सुरूंग लावला आहे.

- राजेश निस्ताने यवतमाळ - दस-यानंतर कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होईल, शेतकºयांची दिवाळी गोड होईल, असा दावा राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार करीत आहेत. परंतु, सरकारचाच एक घटक असलेल्या शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मात्र मंत्र्यांच्या या दाव्यांना सुरूंग लावला आहे. प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी किमान मार्च-एप्रिल उजाडणार असून यंदाची शेतक-यांची दिवाळी गोड नाहीच, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरातील शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. या माफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याबाबतचे वेगवेगळे मुहूर्त सत्ताधा-यांकडून सतत जाहीर केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात ही माफी लांबणीवर पडत आहे. माफीसाठी लागणा-या निधीची जुळवाजुळव करण्यासाठी तपासणी, आॅडिटच्या नावाखाली सरकारचा टाईमपास सुरू असल्याची विरोधकांची ओरड आहे. त्यांची ही ओरड आता खरी वाटू लागली आहे. कारण राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे पद सांभाळणा-या शेतकरी नेत्यानेच त्याला अधिकृत दुजोरा दिला आहे. गुरुवारी येथील शासकीय विश्रामभवनावर ‘माध्यमा’ला दिलेल्या मुलाखतीत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कर्जमाफीची सद्यस्थिती कथन केली. तिवारी म्हणाले, कर्जमाफीबाबत इतर राजकीय नेते काय बोलतात हे आपल्यासाठी महत्वाचे नाही. कर्जमाफीचे वास्तव वेगळेच आहे. बँकांना बुडित कर्ज मिळावे, बँकांचे संवर्धन व्हावे यासाठी कर्जमाफी दिली जाते. यापूर्वी ही बाब सिद्ध झाली आहे. यावेळीही त्या पेक्षा वेगळे काही होईल, असे वाटत नाही. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी गोड होणार नाहीच, तशीही साखर महागली आहेच.  सरकार बँकांशी करार करणारकर्जमाफीचा पैसा जमा केला तरी बँका शेतकºयांना नव्याने पीक कर्ज सहजासहजी देणार नाहीत. म्हणून बँकांच्या खात्यात माफीची रक्कम टाकताना व शेतकºयांचे थकीत कर्ज निल करतानाच बँकांशी सरकारकडून करार केला जाईल. नवीन पीक कर्ज शेतकºयांना देऊ याची हमी घेतली जाईल. पीक कर्जाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यासाठी किमान मार्च-एप्रिल महिना उजाडणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले. झटपट माफीचे दुष्परिणाम अधिक तिवारी म्हणाले, युती सरकारने कर्जमाफी संबंधी जी घोषणा केली, त्याची निश्चित संपूर्ण अंमलबजावणी होईल. मात्र त्यासाठी वेळ लागणार आहे. कर्जमाफी देण्यासाठी वेळ लागत नसेल आणि सरकार झटपट काही करत असेल तर त्याचे दुष्परिणामही भविष्यात भोगावे लागणार आहे.  अजूनही २००८ ची कर्जमाफी नाही यापूर्वी अशा झटपट कर्जमाफीचा अनुभव २००८ मध्ये दिसून आला. आजही विदर्भातील अनेक शेतक-यांना त्यातील कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीला लबाडाचे आमंत्रण संबोधणा-या नेत्यांनी या सरकारला शहाणपन शिकविण्याची गरज नाही. कारण लबाडाचे आमंत्रण कोण देते आणि लबाडी नेमकी कुणी केली, हे जनतेला चांगले ठाऊक असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार