लॉकडाऊन; प्रदूषणात कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अडीच महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’मुळे शहरात वाहनांची वर्दळ मंदावली. बांधकामे ठप्प झाली व उद्योगही बंद असल्याने ...

लॉकडाऊन; प्रदूषणात कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अडीच महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’मुळे शहरात वाहनांची वर्दळ मंदावली. बांधकामे ठप्प झाली व उद्योगही बंद असल्याने प्रदुषणात निम्याहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. व्यापारी क्षेत्रात ‘आएसपीएम’चे प्रमाण सरासरीने १११ ने कमी होऊन ५२ पर्यत आढळून आल्याचा प्रदुषण विभागाचा अहवाल आहे.
औद्योगिक क्षेत्रात देखिल १८ व रहिवासी क्षेत्रात २३ पर्यत आढळून आले आहे. कोरोनाचे संकटात शहरातील नागरिकांचे वर्तणुकीमध्ये बदल झाला. वाहनांची वर्दळ कमी झाली. नागरिकांचे अवागमनात कमी झाल्याने पर्यावरणामध्ये सुधारणा झाली. यापुढेही आरोग्यासाठी पोषक वातावरण मिळावे, ‘लॉकडाऊन’ निवळल्यानंतरही अमरावतीकरांनी स्वंयस्फूर्तीने जनता कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण केल्यास शहराच्या पर्यावरण सुधारणेस उपयुक्त ठरु शकते. यासाठी आठवड्यातून एक दिवस कोणतेही वाहन न वापरणे, सार्वजनिक वाहनांनी प्रवास कमी करणे, एकाच वाहनांनी अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, उद्योग, व्यवसाय बंद ठेवणे अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडणे आदी बाबींचा सकारात्मक परिणाम व शहराचे पर्यावरण सुधारणेसाठी होवू शकतो, असे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी सांगितले.
शहराचे क्षेत्रफळ १२१.६५ चौ.की.मी. व लोकसंख्या आठ लाख आहे. शहराची वाटचाल विकासाकडे होत असताना विकासात्मक कामे रात्रंदिवस सुरु आहे. या कामांमुळे होणारी धुळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर आदींमुळे हवाप्रदुषण होत आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अॅबिएंट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग ( एएक्यूएम) या संस्थेद्वारा प्राप्त आकडेवारीकरुन एनओटूचे प्रमाण १३.०५ व एसओटूचे प्रमाण ११.१८ आढळले. हे प्रमाण प्रदुषण पातळीचे ८० पेक्षा कमी आहे व आरएसपीएमचे प्रमाण ८५.८३ म्हणजेच अनुज्ञेय पातळीतच आढळून आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रात ५३१ शांतता क्षेत्र
दिवसेंदिवस वाढणारे नागरीकरण, वाहनांची संख्या, डिजे संस्कृतीचे वाढते प्रमाण यामुळे शहरातील प्रदूषण पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. ध्वनी प्रदुषणामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परीणाम होतात ही बाब निष्पन्न झाली आहे. नागरी क्षेत्रावर होणारे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालय यासभोवती १०० मिटरचा परिसर असे एकूण ५८१ शांतता क्षेत्र महापालिका क्षेत्रामध्ये घोषित करण्यात आलेले आहे.