शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

लॉकडाऊनने मोडली शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

मोर्शी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधामुळे शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. ...

मोर्शी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधामुळे शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही. आणि बाजारात तो माल नेलाच तर विकला जाईल, याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे, अशी ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था झाली आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीकलागवड करत असतो. खरिपात झालेला अतिपाऊस व त्यामुळे मका, कपाशी यासारख्या पिकांवर आलेले रोग, घटलेले उत्पादन, पडलेले बाजारभाव यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागले नाही. परिणामी संत्रा, मोसंबी, कपाशी, मका, सोयाबीन यासारखी पिके लवकर काढून शेतकऱ्यांनी रबीसाठी आपले रान लवकर मोकळे केले. कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील या एकाच आशेवर कर्जबाजारी होऊन गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, खरबूज, कोहळे, काकडी, कोथिंबीर, भाजीपाला अशी पिके शेतकऱ्यांनी लावली होती. मात्र, गहू व कांदा सोडला तर बाकी पिके ही रोजच्या रोज काढून बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात, अन्यथा ती खराब होतात.

साधारणपणे मार्चपासून टरबूज बाजारात येतात. मात्र, ऐन टरबूज काढण्याच्या वेळीच शासनाकडून लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे व्यापारी माल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा माल शेतातच सडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्रीअभावी फेकून द्यावा लागत आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी फळबाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार ओलित व ठिंबक सिंचनाद्वारे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज व कोहळ्यासारख्या फळभाज्यांची लागवड केली.

कोहळे बेभाव

अक्षय तृतीयाच्या सणाला कोहळ्याला विशेष महत्त्व असते. यावेळी कोहळ्याला बऱ्यापैकी भाव असतो. मात्र, याच पर्वावर लागलेल्या संचारबंदीमुळे फळ,भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काकडी, टोमॅटोे, वांगी भाजीपाला याही पिकांची दैनावस्था आहे. लग्नाचा सिजन डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने लावलेली फुलवलेली ही पिके सोडून देताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे पीक शेतात तयार आहे. पण बाजारात पाहिजे तसा भाव नाही. ग्राहक नाही ही मोठी शोकांतिका आहे.

बॉक्स १

गहू निघाला पण भाव नाही

गहू शेतकऱ्यांनी गव्हाची सवंगणी केली. पण यंदा लॉकडाऊनमुळे वाहवतूक सेवा बंद असल्याने इतरत्र नेण्यास अडचणी येत आहे. परिणामी गव्हाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लॉकडाऊनचे संकट डोक्यावर असताना अवकाळी पावसाने अधिकच चिंतेच भर टाकली. ज्या गव्हाला किमान दोन हजार ते २२०० रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता तिथे आज १५०० रुपयांनी मागितला जात आहे.

खाद्यतेल महागलेलेच

याउलट परिस्थिती किराणा मालाची आहे. जो माल शेतकऱ्यांकडून घेऊन व्यापारी व दलालांनी गोदामे भरून ठेवली आहेत. त्या मालाचे म्हणजे शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर लॉकडाउनमध्ये सतत वाढतच आहेत. लॉकडाउनची परिस्थिती अजून अशीच कायम राहिली तर शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत जातील. गरिबांच्या जेवणातील सोयाबीन तेल १७५ रुपये लिटरवर पोहोचले आहे.