शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

लॉकडाऊनने मोडली शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

मोर्शी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधामुळे शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. ...

मोर्शी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधामुळे शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही. आणि बाजारात तो माल नेलाच तर विकला जाईल, याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे, अशी ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था झाली आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीकलागवड करत असतो. खरिपात झालेला अतिपाऊस व त्यामुळे मका, कपाशी यासारख्या पिकांवर आलेले रोग, घटलेले उत्पादन, पडलेले बाजारभाव यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागले नाही. परिणामी संत्रा, मोसंबी, कपाशी, मका, सोयाबीन यासारखी पिके लवकर काढून शेतकऱ्यांनी रबीसाठी आपले रान लवकर मोकळे केले. कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील या एकाच आशेवर कर्जबाजारी होऊन गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, खरबूज, कोहळे, काकडी, कोथिंबीर, भाजीपाला अशी पिके शेतकऱ्यांनी लावली होती. मात्र, गहू व कांदा सोडला तर बाकी पिके ही रोजच्या रोज काढून बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात, अन्यथा ती खराब होतात.

साधारणपणे मार्चपासून टरबूज बाजारात येतात. मात्र, ऐन टरबूज काढण्याच्या वेळीच शासनाकडून लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे व्यापारी माल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा माल शेतातच सडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्रीअभावी फेकून द्यावा लागत आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी फळबाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार ओलित व ठिंबक सिंचनाद्वारे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज व कोहळ्यासारख्या फळभाज्यांची लागवड केली.

कोहळे बेभाव

अक्षय तृतीयाच्या सणाला कोहळ्याला विशेष महत्त्व असते. यावेळी कोहळ्याला बऱ्यापैकी भाव असतो. मात्र, याच पर्वावर लागलेल्या संचारबंदीमुळे फळ,भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काकडी, टोमॅटोे, वांगी भाजीपाला याही पिकांची दैनावस्था आहे. लग्नाचा सिजन डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने लावलेली फुलवलेली ही पिके सोडून देताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे पीक शेतात तयार आहे. पण बाजारात पाहिजे तसा भाव नाही. ग्राहक नाही ही मोठी शोकांतिका आहे.

बॉक्स १

गहू निघाला पण भाव नाही

गहू शेतकऱ्यांनी गव्हाची सवंगणी केली. पण यंदा लॉकडाऊनमुळे वाहवतूक सेवा बंद असल्याने इतरत्र नेण्यास अडचणी येत आहे. परिणामी गव्हाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लॉकडाऊनचे संकट डोक्यावर असताना अवकाळी पावसाने अधिकच चिंतेच भर टाकली. ज्या गव्हाला किमान दोन हजार ते २२०० रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता तिथे आज १५०० रुपयांनी मागितला जात आहे.

खाद्यतेल महागलेलेच

याउलट परिस्थिती किराणा मालाची आहे. जो माल शेतकऱ्यांकडून घेऊन व्यापारी व दलालांनी गोदामे भरून ठेवली आहेत. त्या मालाचे म्हणजे शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर लॉकडाउनमध्ये सतत वाढतच आहेत. लॉकडाउनची परिस्थिती अजून अशीच कायम राहिली तर शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत जातील. गरिबांच्या जेवणातील सोयाबीन तेल १७५ रुपये लिटरवर पोहोचले आहे.