शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आंतरजातीय विवाह प्रस्ताव रखडले, लाभार्थ्यांचे जि.प. मध्ये हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 17:57 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे २०१७-१८ पासून अद्यापपर्यंत ४०० हून अधिक अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी २५० जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. मात्र अद्यापही जिल्ह्यात १५० हून अधिक प्रस्ताव अनुदानापासून रखडले आहेत.

ठळक मुद्देयोजनेचा बोजवारा

अमरावती : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य शासनामार्फत देण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांचे शेकडो प्रस्ताव अनुदानाअभावी रखडले आहेत. त्यामुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

समाजातील जाती-पातीचा पगडा आजही कायम आहे. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक विषमता दूर व्हावी आणि सलोखा निर्माण व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे ही त्यापैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून आंतरजातीय विवाह केलेल्या प्रत्येक दांपत्याला ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के हिस्सा दिला जातो.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे २०१७-१८ पासून अद्यापपर्यंत ४०० हून अधिक अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी आतापर्यंत २५० जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. मात्र अद्यापही जिल्ह्यात १५० हून अधिक प्रस्ताव अनुदानापासून रखडले आहेत. त्यामुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वारंवार खेटे घालावे लागत आहेत.

समाजाचा व नातेवाईकांचा विरोध पत्करून लग्नगाठ बांधलेल्या या दांपत्यांपुढील संकटांचा डोंगर काही संपता संपत नाही. शासनाच्या मदतीची आशाही मावळत चालली आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतर तो पण त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो; मात्र केंद्र शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक दांपत्ये या योजनेपासून वंचित राहात आहेत. 

योजनेचे हे आहेत निकष

या योजनेचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकजण मागास प्रवर्गातील असावा किंवा दोन्ही मागास प्रवर्गातील असतील, तर त्यांची जात वेगळी असावी. असे असेल तर ते दांपत्य योजनेसाठी पात्र ठरते. त्यासाठी दोघांचे लग्न प्रमाणपत्र आणि जातीचे दाखले सादर करणे आवश्यक आहे.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकzpजिल्हा परिषद