शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

अमरावतीत ड्राय झोन क्षेत्रात होतेय वाढ; पाच तालुक्यातील भूजल पातळीत झाली मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:19 IST

Amravati : शेतीसाठी उपसा वाढला बोअरची संख्याही वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेती व घरगुती कामासाठी मोठ्या प्रमाणात भूजल साठ्याचा उपयोग केला जात असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. परिणामी जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली आहे. एकीकडे सकारात्मक चित्र असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात ड्रायझोन क्षेत्र वाढत चालले आहे. यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून ड्रायझोन क्षेत्र असलेल्या पट्ट्यात प्राधान्याने भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

याशिवाय जलयुक्त शिवारसारख्या योजनामधून पाणी पातळी खोलवर गेलेल्या ठिकाणी जलसंधारणाची कामे, तसेच धरणातील गाळ काढणे, नवीन बंधारे बांधणे यासारखी कामे केल्यास याचा बराच फायदा भूजल वाढीसाठी होऊ शकतो. यासाठी लोकसहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. मागील काही महिन्यातील जिल्ह्यातील भूजलाची स्थिती लक्षात घेता चिखलदरा, चांदुर रेल्वे, धामणगांव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी या पाच तालुक्यातील पाणीपातळी कमी आहे. तर भातकुली तालुक्याची पाणी पातळी स्थिर आहे. अमरावती, अचलपूर, चांदुर बाजार, अंजगाव सुर्जी, दर्यापूर, वरुड या तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाल्याची गत ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.९० मिटरने वाढ झाली आहे.

पाच तालुक्यातील भूजल पातळी सर्वात खोलकाही वर्षात ड्रायझोनचे क्षेत्र वाढल्याने पाणी पातळी खोल गेल्याचा निष्कर्ष जीएचडीएने काढला आहे. यामध्ये चांदुर रेल्वे, चिखलदरा, धामणगांव, मोर्शी, नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे.

चार तालुक्यांची पाणी पातळी सर्वांत चांगलीजिल्ह्यात मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अमरावती या तालुक्यांतील पाणी पातळी बऱ्यापैकी वाढली आहे.

जलसंधारणावर भर देण्याची गरजमागील तीन वर्षात जिल्ह्यात पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली असली तरी १४ पैकी पाच तालुक्यातील पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा अधिक होत आहे. त्यामुळे ड्रायझोन क्षेत्रासह अन्य तालुक्यात जलसंधारणावर भर देण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. पाणी पातळीत वाढ करण्यासाठी पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या तर निश्चित पाणीपातळीत वाढ होऊ शकते.

विहीर, बोअरसाठी परवानगी कुठे घ्याल?महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार एसडीओंना प्राधिकृत केले आहे. सार्वजनिक पिण्याच्या व्यवस्थेसाठी विहीर, बोअरसाठी एसडीओकडे प्रस्ताव देऊन याला मंजुरी दिली जाते.

कुठल्या तालुक्याची पाणीपातळी किती ?तालुका             पाणीपातळीअचलपूर               ३.५१अमरावती              ०.१६अंजनगाव सुर्जी       १.०२भातकुली              ०.५९चांदुर रेल्वे             ०.२४चांदुर बाजार           ४.२३चिखलदरा              ०,०१दर्यापूर                   १.०८धामणगांव रेल्वे      ०.१७धारणी                   ०.०५मोर्शी                     ०.२३नांदगाव खंडेश्वर     ०.११तिवसा                   ०.२१वरूड                   १.०६

टॅग्स :Amravatiअमरावतीwater shortageपाणीकपात