शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ड्राय झोन क्षेत्रात होतेय वाढ; पाच तालुक्यातील भूजल पातळीत झाली मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:19 IST

Amravati : शेतीसाठी उपसा वाढला बोअरची संख्याही वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेती व घरगुती कामासाठी मोठ्या प्रमाणात भूजल साठ्याचा उपयोग केला जात असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. परिणामी जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली आहे. एकीकडे सकारात्मक चित्र असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात ड्रायझोन क्षेत्र वाढत चालले आहे. यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून ड्रायझोन क्षेत्र असलेल्या पट्ट्यात प्राधान्याने भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

याशिवाय जलयुक्त शिवारसारख्या योजनामधून पाणी पातळी खोलवर गेलेल्या ठिकाणी जलसंधारणाची कामे, तसेच धरणातील गाळ काढणे, नवीन बंधारे बांधणे यासारखी कामे केल्यास याचा बराच फायदा भूजल वाढीसाठी होऊ शकतो. यासाठी लोकसहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. मागील काही महिन्यातील जिल्ह्यातील भूजलाची स्थिती लक्षात घेता चिखलदरा, चांदुर रेल्वे, धामणगांव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी या पाच तालुक्यातील पाणीपातळी कमी आहे. तर भातकुली तालुक्याची पाणी पातळी स्थिर आहे. अमरावती, अचलपूर, चांदुर बाजार, अंजगाव सुर्जी, दर्यापूर, वरुड या तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाल्याची गत ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.९० मिटरने वाढ झाली आहे.

पाच तालुक्यातील भूजल पातळी सर्वात खोलकाही वर्षात ड्रायझोनचे क्षेत्र वाढल्याने पाणी पातळी खोल गेल्याचा निष्कर्ष जीएचडीएने काढला आहे. यामध्ये चांदुर रेल्वे, चिखलदरा, धामणगांव, मोर्शी, नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे.

चार तालुक्यांची पाणी पातळी सर्वांत चांगलीजिल्ह्यात मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अमरावती या तालुक्यांतील पाणी पातळी बऱ्यापैकी वाढली आहे.

जलसंधारणावर भर देण्याची गरजमागील तीन वर्षात जिल्ह्यात पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली असली तरी १४ पैकी पाच तालुक्यातील पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा अधिक होत आहे. त्यामुळे ड्रायझोन क्षेत्रासह अन्य तालुक्यात जलसंधारणावर भर देण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. पाणी पातळीत वाढ करण्यासाठी पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या तर निश्चित पाणीपातळीत वाढ होऊ शकते.

विहीर, बोअरसाठी परवानगी कुठे घ्याल?महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार एसडीओंना प्राधिकृत केले आहे. सार्वजनिक पिण्याच्या व्यवस्थेसाठी विहीर, बोअरसाठी एसडीओकडे प्रस्ताव देऊन याला मंजुरी दिली जाते.

कुठल्या तालुक्याची पाणीपातळी किती ?तालुका             पाणीपातळीअचलपूर               ३.५१अमरावती              ०.१६अंजनगाव सुर्जी       १.०२भातकुली              ०.५९चांदुर रेल्वे             ०.२४चांदुर बाजार           ४.२३चिखलदरा              ०,०१दर्यापूर                   १.०८धामणगांव रेल्वे      ०.१७धारणी                   ०.०५मोर्शी                     ०.२३नांदगाव खंडेश्वर     ०.११तिवसा                   ०.२१वरूड                   १.०६

टॅग्स :Amravatiअमरावतीwater shortageपाणीकपात