शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

अमरावतीत ड्राय झोन क्षेत्रात होतेय वाढ; पाच तालुक्यातील भूजल पातळीत झाली मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:19 IST

Amravati : शेतीसाठी उपसा वाढला बोअरची संख्याही वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेती व घरगुती कामासाठी मोठ्या प्रमाणात भूजल साठ्याचा उपयोग केला जात असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. परिणामी जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली आहे. एकीकडे सकारात्मक चित्र असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात ड्रायझोन क्षेत्र वाढत चालले आहे. यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून ड्रायझोन क्षेत्र असलेल्या पट्ट्यात प्राधान्याने भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

याशिवाय जलयुक्त शिवारसारख्या योजनामधून पाणी पातळी खोलवर गेलेल्या ठिकाणी जलसंधारणाची कामे, तसेच धरणातील गाळ काढणे, नवीन बंधारे बांधणे यासारखी कामे केल्यास याचा बराच फायदा भूजल वाढीसाठी होऊ शकतो. यासाठी लोकसहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. मागील काही महिन्यातील जिल्ह्यातील भूजलाची स्थिती लक्षात घेता चिखलदरा, चांदुर रेल्वे, धामणगांव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी या पाच तालुक्यातील पाणीपातळी कमी आहे. तर भातकुली तालुक्याची पाणी पातळी स्थिर आहे. अमरावती, अचलपूर, चांदुर बाजार, अंजगाव सुर्जी, दर्यापूर, वरुड या तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाल्याची गत ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.९० मिटरने वाढ झाली आहे.

पाच तालुक्यातील भूजल पातळी सर्वात खोलकाही वर्षात ड्रायझोनचे क्षेत्र वाढल्याने पाणी पातळी खोल गेल्याचा निष्कर्ष जीएचडीएने काढला आहे. यामध्ये चांदुर रेल्वे, चिखलदरा, धामणगांव, मोर्शी, नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे.

चार तालुक्यांची पाणी पातळी सर्वांत चांगलीजिल्ह्यात मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अमरावती या तालुक्यांतील पाणी पातळी बऱ्यापैकी वाढली आहे.

जलसंधारणावर भर देण्याची गरजमागील तीन वर्षात जिल्ह्यात पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली असली तरी १४ पैकी पाच तालुक्यातील पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा अधिक होत आहे. त्यामुळे ड्रायझोन क्षेत्रासह अन्य तालुक्यात जलसंधारणावर भर देण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. पाणी पातळीत वाढ करण्यासाठी पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या तर निश्चित पाणीपातळीत वाढ होऊ शकते.

विहीर, बोअरसाठी परवानगी कुठे घ्याल?महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार एसडीओंना प्राधिकृत केले आहे. सार्वजनिक पिण्याच्या व्यवस्थेसाठी विहीर, बोअरसाठी एसडीओकडे प्रस्ताव देऊन याला मंजुरी दिली जाते.

कुठल्या तालुक्याची पाणीपातळी किती ?तालुका             पाणीपातळीअचलपूर               ३.५१अमरावती              ०.१६अंजनगाव सुर्जी       १.०२भातकुली              ०.५९चांदुर रेल्वे             ०.२४चांदुर बाजार           ४.२३चिखलदरा              ०,०१दर्यापूर                   १.०८धामणगांव रेल्वे      ०.१७धारणी                   ०.०५मोर्शी                     ०.२३नांदगाव खंडेश्वर     ०.११तिवसा                   ०.२१वरूड                   १.०६

टॅग्स :Amravatiअमरावतीwater shortageपाणीकपात