शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'लग्नानंतर तुम्ही काहीचं केलं नाही, तर पोरं कशी होणार?' गडकरींच्या उदाहरणाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 19:54 IST

नितीन गडकरी यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले

अमरावती/मुंबई - केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची विरोधकांकडूनही प्रशंसा करण्यात येते. रस्ते बांधणे आणि देशातील वाहतूक व्यवस्थेसाठी दिवस-रात्र एक करत काम करणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे, त्यांचे विधान प्रमाण मानले जाते, त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत आहेत. यापूर्वी उडणारी बस आणि पेट्रोल हद्दपार होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी दिलेलं उदाहरण चर्चेचा विषय बनलं आहे.   

नितीन गडकरी यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पादन आणि विक्री याबाबत मार्गदर्शन करताना नितीन गडकरींनी यांनी दिलेल्या उदाहरणामुळे ते सोशल मीडियावर चर्चेत आले. देवाचा आशीर्वाद असतोच, पण आपले प्रयत्नही असायला हवेत. आपले प्रयत्न असल्याशिवाय काहीच होत नाही, असे त्यांना सांगायचे होते. त्यासाठी, त्यांनी दिलेलं उदाहरण ऐकून उपस्थितांना हसूल आले. तर, सोशल मीडियावर गडकरी ट्रोल झाले.  

शेतमालाच चांगलं उत्पादन केलं चांगलं पॅकींग केलं तर तुम्ही पिकवलेली संत्री देखील विदेशात जाईल. नाही तर मग अस व्हायला नको देवाचा आर्शिवाद आहे आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरग कसं होणार, असं नितीन गडकरी म्हणाले. त्यांचे हे व्यक्तव्य ऐकून सभागृहात हशा पिकला. शेतमालाला मार्केच मिळावे यासाठी तुम्हालाही काही इनिशीटीव्ह घ्यावं लागेल असा सल्लाच गडकरींनी शेतकऱ्यांना दिला. मात्र, या उदाहरणाची चर्चा चांगलीच रंगली. 

विदर्भात शुगर इंस्टीट्यूटची शाखा

शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा विदर्भात होणार असल्याचे सांगत या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.

नागपूर-अमरावती-नरखेड मेट्रो लवकरच 

मेट्रोचा प्रवास हा बसपेक्षा स्वस्तात पडतो. त्यामुळे अमरावती-नागपूर-नरखेड असा नवा मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले. आठ डब्यांची मेट्रो असणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. ताशी १४० ते १५० किमीचा मेट्रोचा वेग राहणार असून, यंदा डिसेंबरअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोंदिया, भंडारा, वडसा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव असादेखील पुढील टप्पा मेट्रोचा राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

पुढील 5 वर्षात पेट्रोल हद्दपार होईल

नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मोठं विधान केलं होतं. पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी, कृषी विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित केले. 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीNitin Gadkariनितीन गडकरीFarmerशेतकरीmarriageलग्न