शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

'लग्नानंतर तुम्ही काहीचं केलं नाही, तर पोरं कशी होणार?' गडकरींच्या उदाहरणाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 19:54 IST

नितीन गडकरी यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले

अमरावती/मुंबई - केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची विरोधकांकडूनही प्रशंसा करण्यात येते. रस्ते बांधणे आणि देशातील वाहतूक व्यवस्थेसाठी दिवस-रात्र एक करत काम करणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे, त्यांचे विधान प्रमाण मानले जाते, त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत आहेत. यापूर्वी उडणारी बस आणि पेट्रोल हद्दपार होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी दिलेलं उदाहरण चर्चेचा विषय बनलं आहे.   

नितीन गडकरी यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पादन आणि विक्री याबाबत मार्गदर्शन करताना नितीन गडकरींनी यांनी दिलेल्या उदाहरणामुळे ते सोशल मीडियावर चर्चेत आले. देवाचा आशीर्वाद असतोच, पण आपले प्रयत्नही असायला हवेत. आपले प्रयत्न असल्याशिवाय काहीच होत नाही, असे त्यांना सांगायचे होते. त्यासाठी, त्यांनी दिलेलं उदाहरण ऐकून उपस्थितांना हसूल आले. तर, सोशल मीडियावर गडकरी ट्रोल झाले.  

शेतमालाच चांगलं उत्पादन केलं चांगलं पॅकींग केलं तर तुम्ही पिकवलेली संत्री देखील विदेशात जाईल. नाही तर मग अस व्हायला नको देवाचा आर्शिवाद आहे आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरग कसं होणार, असं नितीन गडकरी म्हणाले. त्यांचे हे व्यक्तव्य ऐकून सभागृहात हशा पिकला. शेतमालाला मार्केच मिळावे यासाठी तुम्हालाही काही इनिशीटीव्ह घ्यावं लागेल असा सल्लाच गडकरींनी शेतकऱ्यांना दिला. मात्र, या उदाहरणाची चर्चा चांगलीच रंगली. 

विदर्भात शुगर इंस्टीट्यूटची शाखा

शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा विदर्भात होणार असल्याचे सांगत या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.

नागपूर-अमरावती-नरखेड मेट्रो लवकरच 

मेट्रोचा प्रवास हा बसपेक्षा स्वस्तात पडतो. त्यामुळे अमरावती-नागपूर-नरखेड असा नवा मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले. आठ डब्यांची मेट्रो असणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. ताशी १४० ते १५० किमीचा मेट्रोचा वेग राहणार असून, यंदा डिसेंबरअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोंदिया, भंडारा, वडसा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव असादेखील पुढील टप्पा मेट्रोचा राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

पुढील 5 वर्षात पेट्रोल हद्दपार होईल

नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मोठं विधान केलं होतं. पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी, कृषी विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित केले. 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीNitin Gadkariनितीन गडकरीFarmerशेतकरीmarriageलग्न