शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

अमरावतीत तीन तालुक्यांत गारपीट; यशोमती ठाकूरांकडून सर्वेक्षणाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 8:24 PM

धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली.

अमरावती : जिल्ह्यातील धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली. या गारपिटीमुळे या तीन तालुक्यांत खरीप-रबी पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. यात तिवसा २७.६, मोर्शी २३.८, चिखलदरा २६.९ तर वरूड तालुक्यात सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली. या अवकाळी पावसाने कपाशी, तूर, संत्रा, केळी व रबीतील गव्हाचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयानुसार, मोर्शी तालुक्यातील ५९ गावांमधील ४५१३ हेक्टरवरील संत्रा, वरुड तालुक्यातील १४० गावांमधील १० हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा व कपाशी बाधित झाली.तिवसा तालुक्यातील १७ गावांमधील ३३२० हेक्टरवरील संत्रा, गहू, तूर, चना, कांदा पीक बाधित झाले. तर चांदूर बाजार तालुक्यातील दोन गावांमधील ४६५ हेक्टर क्षेत्रावरील तूर व हरभरा बाधित झाला. एकंदरीत परतीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना सलग दोन दिवसांतील अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतक-यांवर संकट कोसळले आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याचे आदेश महसूल यंत्रणेस दिले आहेत.