शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
4
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
5
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
6
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
7
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
8
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
9
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
11
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
12
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
13
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
14
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
15
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
16
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
17
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
18
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
19
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
20
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

भूजल विभाग पाणी गुणवत्ता तपासणीत खरा उतरणार का?

By admin | Updated: January 3, 2015 22:54 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अख्त्यारित असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी, साहित्य पाणीपुरवठा व

अमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अख्त्यारित असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी, साहित्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या नियंत्रणाखाली देण्याचा निर्णय शासनाने घेतला आला आहे. मात्र सद्यस्थितीत या विभागाकडे यंत्रणा अपुरी असल्याने पाणी तपासणी कार्याला गती येईल का, असा संभ्रम निर्माण झाला असून कर्मचारी शासन निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून १३८ प्रयोग शाळा सुरु आहेत. आणखी १० प्रयोगशाळा उघडण्यात येणार आहेत. यामध्ये पाण्याची रासायनिक व अनुजीव तपासणी करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून हा विभाग पाणी तपासणी कार्यात अग्रेसर असून निरंतर सेवा देत आहे. आरोग्य विभागाच्या प्रयोेगशाळेला देशात प्रथम क्रमांकाचा दर्जा मिळाल्याचेही प्रयोगशाळा तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मात्र नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे आरोग्य विभागातील प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग किती खरा ठरेल हे भविष्यात उघड होईल. मात्र या विभागाकडे सद्यस्थितीत पाणी गुणवत्ता तपासणीबाबत अपुरी यंत्रणा असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे हा विभाग पाणी गुणवत्ता तपासणीच्या कार्याला गती देईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी व योग्य प्रकारे सनियंत्रण होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ३४ जिल्हा प्रयोगशाळेतील कंत्राटी मनुष्यबळ, १३८ उपविभागीय प्रयोगशाळा, साहित्य व नव्याने स्थापन होणाऱ्या १० उपविभागीय प्रयोगशाळा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रयोगशाळा ज्या ठिकाणी कार्यरत राहतील त्याप्रमाणे जागेच्या उपलब्धतेनंतर प्रयोगशाळा स्थंलातरित करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे सोपविण्यात आल्या असून त्याचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यात येणार आहे. मात्र सध्या या विभागाकडे राज्यभरात केवळ सहा उपविभागीय प्रयोगशाळा आहेत. त्याच प्रमाणे मनुष्यबळसुध्दा कमी आहे. त्यामुळे पाणी गुणवत्ता तपासणी कार्यात हा विभाग किती खरा ठरतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)