शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Good News : पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 18:29 IST

सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे.

- गजानन मोहोडअमरावती : सरासरीपेक्षा अधिक पाऊस, त्यामुळे सिंचनासाठी कमी झालेला उपसा व सप्टेंबरनंतरही झालेल्या पावसाने जलपुनर्भरण यामुळे पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ झालेली आहे. त्यातुलनेत फक्त सात तालुक्यांत कमी आलेली आहे. सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या हजार कामांचेही सुखद चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) द्वारा अमरावती विभागात झालेले पर्जन्यमान व ६३१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीशी पाच वर्षांच्या सरासरीची तुलना केल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४६ विहिरींमध्ये १.५३ मीटरने वाढ झालेली आहे. अकोला जिल्ह्यात ६५ निरीक्षण विहिरींमध्ये ०.२१, वाशीम जिल्ह्यात ७९ विहिरींमध्ये ०.१७, बुलडाणा जिल्ह्यात १६५ विहिरींमध्ये २.३२, तर यवतमाळ जिल्ह्यात १७६ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीत ०.६८ ने वाढ झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा व यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील भूजलस्तरात कमी आलेली आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात सर्वाधिक ३.६० मीटर, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व अमरावती जिल्ह्यात मोर्शी व वरूड तालुक्यात २ मीटरपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. भूजलात तूट आलेल्या तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अन्वये भूूजल उपशावर नियंत्रण आवश्यक असल्याची शिफारस शासनाला करण्यात आलेली आहे.

आठ टक्के भूभागातच भूजलाची उपलब्धीराज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टक्के भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीण अशा अग्निजन्य खडकाने व्यापला आहे ज्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता अत्यंत कमी म्हणजे १ ते ३ टक्केच आहे. १० टक्के भूभाग कठीण रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येही भूजलाची उपलब्धता कमी आहे. उर्वरित ८ टक्के भूभाग हा खडकांनी व गाळाने व्यापला असल्याने त्यात भूजलाची उपलब्धता चांगल्याप्रकारे होत असल्याचे जीएसडीएने सांगितले.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने उपसा कमी झाला व सप्टेंबरनंतरही पाऊस झाला. त्यामुळे जलपुनर्भरण झालेले आहे. याशिवाय विभागात झालेल्या जलयुक्त शिवारमधील कामांचादेखील हा सकारात्मक परिणाम आहे.- उल्हास बंड, भूवैज्ञानिक, जीएसडीए

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भDamधरण