शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Good News : पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 18:29 IST

सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे.

- गजानन मोहोडअमरावती : सरासरीपेक्षा अधिक पाऊस, त्यामुळे सिंचनासाठी कमी झालेला उपसा व सप्टेंबरनंतरही झालेल्या पावसाने जलपुनर्भरण यामुळे पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ झालेली आहे. त्यातुलनेत फक्त सात तालुक्यांत कमी आलेली आहे. सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या हजार कामांचेही सुखद चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) द्वारा अमरावती विभागात झालेले पर्जन्यमान व ६३१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीशी पाच वर्षांच्या सरासरीची तुलना केल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४६ विहिरींमध्ये १.५३ मीटरने वाढ झालेली आहे. अकोला जिल्ह्यात ६५ निरीक्षण विहिरींमध्ये ०.२१, वाशीम जिल्ह्यात ७९ विहिरींमध्ये ०.१७, बुलडाणा जिल्ह्यात १६५ विहिरींमध्ये २.३२, तर यवतमाळ जिल्ह्यात १७६ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीत ०.६८ ने वाढ झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा व यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील भूजलस्तरात कमी आलेली आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात सर्वाधिक ३.६० मीटर, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व अमरावती जिल्ह्यात मोर्शी व वरूड तालुक्यात २ मीटरपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. भूजलात तूट आलेल्या तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अन्वये भूूजल उपशावर नियंत्रण आवश्यक असल्याची शिफारस शासनाला करण्यात आलेली आहे.

आठ टक्के भूभागातच भूजलाची उपलब्धीराज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टक्के भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीण अशा अग्निजन्य खडकाने व्यापला आहे ज्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता अत्यंत कमी म्हणजे १ ते ३ टक्केच आहे. १० टक्के भूभाग कठीण रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येही भूजलाची उपलब्धता कमी आहे. उर्वरित ८ टक्के भूभाग हा खडकांनी व गाळाने व्यापला असल्याने त्यात भूजलाची उपलब्धता चांगल्याप्रकारे होत असल्याचे जीएसडीएने सांगितले.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने उपसा कमी झाला व सप्टेंबरनंतरही पाऊस झाला. त्यामुळे जलपुनर्भरण झालेले आहे. याशिवाय विभागात झालेल्या जलयुक्त शिवारमधील कामांचादेखील हा सकारात्मक परिणाम आहे.- उल्हास बंड, भूवैज्ञानिक, जीएसडीए

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भDamधरण