शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

Good News : पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 18:29 IST

सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे.

- गजानन मोहोडअमरावती : सरासरीपेक्षा अधिक पाऊस, त्यामुळे सिंचनासाठी कमी झालेला उपसा व सप्टेंबरनंतरही झालेल्या पावसाने जलपुनर्भरण यामुळे पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ झालेली आहे. त्यातुलनेत फक्त सात तालुक्यांत कमी आलेली आहे. सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या हजार कामांचेही सुखद चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) द्वारा अमरावती विभागात झालेले पर्जन्यमान व ६३१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीशी पाच वर्षांच्या सरासरीची तुलना केल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४६ विहिरींमध्ये १.५३ मीटरने वाढ झालेली आहे. अकोला जिल्ह्यात ६५ निरीक्षण विहिरींमध्ये ०.२१, वाशीम जिल्ह्यात ७९ विहिरींमध्ये ०.१७, बुलडाणा जिल्ह्यात १६५ विहिरींमध्ये २.३२, तर यवतमाळ जिल्ह्यात १७६ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीत ०.६८ ने वाढ झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा व यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील भूजलस्तरात कमी आलेली आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात सर्वाधिक ३.६० मीटर, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व अमरावती जिल्ह्यात मोर्शी व वरूड तालुक्यात २ मीटरपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. भूजलात तूट आलेल्या तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अन्वये भूूजल उपशावर नियंत्रण आवश्यक असल्याची शिफारस शासनाला करण्यात आलेली आहे.

आठ टक्के भूभागातच भूजलाची उपलब्धीराज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टक्के भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीण अशा अग्निजन्य खडकाने व्यापला आहे ज्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता अत्यंत कमी म्हणजे १ ते ३ टक्केच आहे. १० टक्के भूभाग कठीण रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येही भूजलाची उपलब्धता कमी आहे. उर्वरित ८ टक्के भूभाग हा खडकांनी व गाळाने व्यापला असल्याने त्यात भूजलाची उपलब्धता चांगल्याप्रकारे होत असल्याचे जीएसडीएने सांगितले.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने उपसा कमी झाला व सप्टेंबरनंतरही पाऊस झाला. त्यामुळे जलपुनर्भरण झालेले आहे. याशिवाय विभागात झालेल्या जलयुक्त शिवारमधील कामांचादेखील हा सकारात्मक परिणाम आहे.- उल्हास बंड, भूवैज्ञानिक, जीएसडीए

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भDamधरण