शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चारशे वर्षांची परंपरा, पण दरवर्षी रक्ताचा दरवळ! गोटमार यात्रेत ९३४ भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:12 IST

Amravati : पोळ्याच्या पाडव्याला पांढुर्णा- सावरगावमध्ये दोन्ही राज्यांतील हजारो भाविक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड (अमरावती): आख्यायिकेतून जन्माला आली श्रद्धा आणि ती परंपरा बनून गोटमार यात्रेच्या स्वरूपात वर्षानुवर्षे हजारोंच्या रक्ताचे पाट वाहवत राहिली. दोन्ही राज्यांतील नागरिकांची लाखोंच्या संख्येने हजेरी असलेल्या या यात्रेत यंदा जांब नदीतील झेंडा मिळविण्याच्या चढाओढीत ९३४ भाविक जखमी झाले. दोन गंभीर जखमींना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पोळ्याच्या पाडव्याला ही यात्रा नजीकच्या मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सावरगाव या दोन गावांमध्ये पार पडली. पोळ्याच्या पाडव्याला अर्थात श्रावणी अमावास्येला सकाळी सहा वाजता पळसाच्या झाडाचा झेंडा विधिवत पूजाअर्चा करून जांब नदीच्या मध्यभागी लावण्यात येऊन गोटमार यात्रेला सुरुवात झाली.

पांढुर्णा आणि सावरगाव या गावांदरम्यान जांब नदी असून नदीमध्ये असलेल्या चंडीमातेची पूजा करून सावरगाव येथील भाविक पळसाचे झाड तोडून आणून लावतात. ही पूजाअर्चा करण्याचा मान कावळे परिवाराला आहे. पळसाच्या झाडाचा झेंडा लावल्यानंतर पांढुर्णा आणि सावरगावच्या भाविकांमध्ये गोटमारीची धुमश्चक्री सुरू होते. झेंडा न मिळाल्यास सूर्यास्तानंतर तो काढून चंडीमातेच्या मंदिरात नेऊन पूजापाठ, आरती करून गोटमार यात्रेची सांगता होते.

चोख बंदोबस्तसुरक्षेकरिता छिंदवाडा, बैतूल, सिवनी, नरसिंगपूर आणि पांढुर्णा येथील सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अजय देव, जिल्हा पोलिस अधीक्षक सुंदरसिंग कणिक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सहा अस्थायी आरोग्य केंद्रेमध्य प्रदेश प्रशासनाने सहा अस्थायी आरोग्य केंद्रे, ५८ डॉक्टर, २०० आरोग्य सेवक आणि सुरक्षेसाठी ६०० पोलिस कर्मचारी तैनात केले होते. पांढुर्णा जिल्हाधिकारी अजय देव यांनी कलम १४४ लागू करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला.

१९५२ पासून १३ लोकांचा मृत्यूगोटमार यात्रेची परंपरा ४०० वर्षांपूर्वीची असल्याचे जाणकार सांगतात. यात १९५५ मध्ये पहिला बळी गेला होता. तेव्हापासून २०२३ पर्यंत १३ लोकांचे बळी गेले, तर हजारो भाविकांना अपंगत्व आले. ज्यांच्या घरातील लोक अपंग किंवा बळी गेला ते या दिवसाला शोक व्यक्त करतात. मात्र, बळींची नोंद मध्य प्रदेश शासनाकडे नाही, हे विशेष.

टॅग्स :AmravatiअमरावतीMadhya Pradeshमध्य प्रदेश