शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

अखेर प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेशाला मुदतवाढ,  अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 4:59 PM

 इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणा-या महाविद्यालयांत प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत प्रवेश घेता येईल, याबाबतची अधिसूचना गुरूवारी निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावती, दि. 14 - इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणा-या महाविद्यालयांत प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत प्रवेश घेता येईल, याबाबतची अधिसूचना गुरूवारी निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय महाविद्यालये वगळता अन्य अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यापूर्वी ७ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख ७ सप्टेंबर ही होती. इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही महाविद्यालयात प्रथमवर्ष अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नसल्याच्या तक्रारी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. त्यामुळे हा विषय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित असल्याने महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागाने प्रथमवर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यात कला, वाणिज्य, विज्ञान, समाजविज्ञान आदी शाखांमधील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. नव्या निर्णयामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३७५ महाविद्यालयांमध्ये प्रथमवर्ष अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

‘‘यापूर्वी प्रथमवर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख ७ सप्टेंबर होती. मात्र, इयत्ता १२ वीचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थी प्रथमवर्ष अभ्यासक्रमापासून वंचित राहू नये, यासाठी प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे.- ए.डी.चव्हाण,उपकुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग.

प्रवेशासंदर्भात प्राचार्यांना पत्र...प्रथमवर्ष अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरपर्यंत प्रवेश द्यावा, याबाबतचे पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून प्राचार्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आल्यास ते बिनशर्त स्वीकारावे, अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी