शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, आसेगाव ठाण्यात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 6:49 PM

जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतक-यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाहीत, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

अमरावती : जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतक-यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाहीत, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बीटी बियाणे कंपन्यांनी नमूद केलेल्या धोरणाप्रमाणे शेतक-यांना बियाण्यांची विक्री केलेली नाही. त्यामुळे कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला व शेतक-यांचे प्रति एकर सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे भातकुलीचे तालुका कृषी अधिका-याद्वारा सोमवारी सायंकाळी कृषी विभागाच्यावतीने आसेगाव ठाण्यात बियाणे कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार दाखल करण्यात आली. या  आधारे कावेरी व अजित सिड्स या दोन  बीटी बियाणे कंपनीविरुद्ध भादंवी ४२० व कलम १३ महाराष्ट्र सिड्स अ‍ॅक्ट २००९ अन्वये गुन्हा नोंदविला. मंगळवारी दुपारी आसेगाव पोलिसांनी पूर्णानगत तेथील सात शेतकºयांच्या बाधित पिकाचा पंचनामा केला

बियाणे कंपन्यांविरूद्ध विदर्भातील दुसरी तक्रारजिल्हा समितीच्या अहवालात ९६ टक्के बोंडे किडली असल्याने किमान एक लाख २५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. याविषयीची पहिली तक्रार अकोला येथे, तर दुसरी तक्रार आसेगाव ठाण्यात कृषी विभागाच्यावतीने दाखल झालीे. विभागात आठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित असल्याने त्या शेतक-यांना न्याय व नुकसान भरपाई केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.

बुधवारी पुण्याला कृषी आयुक्तांनी बैठक बोलाविलीे. यामध्ये विभागातील बीटी कपाशीच्या नुकसानीची स्थिती सादर करणार आहोत. या बैठकीत शेतक-यांना दिलासाजनक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.- सुभाष नागरे,कृषी सहसंचालक

टॅग्स :Crimeगुन्हा