शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने घेतला मृत्यूचा घोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:17 IST

लोकमतने मांडले वास्तव; आ. बळवंत वानखडे यांची ‘लक्षवेधी’

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. दर १५ तासाला एक शेतकरीमृत्यूला कवटाळत आहे. मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने मृत्यूचा घोट घेतल्याची घटना नुकतीच अंजनगाव सुर्जी तालुक्यात घडली. दुष्काळ, नापिकीने शेतकऱ्यांचा धीर खचत असल्याने जिल्ह्यास विशेष पॅकेज देण्याची मागणी आ. बळवंत वानखडे यांनी मंगळवारी सभागृहात केली.

जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने आ. वानखडे यांनी लक्षवेधी केली होती व मंगळवारी सकाळी यावर सभागृहात चर्चा झाली. जिल्ह्यात यंदा ११ महिन्यांत एकूण ३२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव नजिकच्या काळात निदर्शनास आलेले आहे. शासन व जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा, आजारपण, कुटुंबाचे संगोपन, यांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने समुपदेशनासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याउलट जिल्ह्यातील महाराष्ट्र बँक व अन्य बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी कोर्टाच्या नोटिसा पाठवत आहेत. खाती गोठवली जात आहेत. शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.

सभागृहात ‘लोकमत’च्या वृत्ताचा पुरावा

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. दै. 'लोकमत'ने यांची दखल घेत सातत्याने वृत्त प्रसिद्ध केल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले असल्याचे आ. बळवंत वानखडे यांनी सभागृहात सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला लोकमतने समोर आणल्याचे ते म्हणाले.

डीसीएम पालकमंत्री असताना शेतकरी अडचणीत

उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या शासनामार्फत विदर्भाच्या आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर कायमचा अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सिंचन सुविधा नसल्याने शेतकरी आत्महत्या

तत्कालीन प्रधानमंत्री, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी धामणगावला येऊन सिंचन अनुशेष दूर होण्यासाठी ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत सिंचन प्रकल्प मंजूर केले. यात दर्यापूर मतदारसंघातील चंद्रभागा, वाघाडी, सामदा सौंदळी या प्रकल्पांना सन २००९ मध्ये प्रशासकीय मंजुरी असताना अद्यापपर्यंत प्रकल्प अपूर्ण असल्याने ते म्हणाले.

शेतकऱ्यांना एकत्रित योजनांचा लाभ देणार

आ. वानखडे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना ना. शंभूराजे देसाई यांनी शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्जपुरवठा होण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात येतील. याशिवाय संबंधित विभागाच्या एकत्रित योजनेचा लाभ त्या- त्या जिल्ह्यास देण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केल्या जात असल्याचे ना. देसाई यांनी सभागृहात सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूEducationशिक्षण