शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने घेतला मृत्यूचा घोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:17 IST

लोकमतने मांडले वास्तव; आ. बळवंत वानखडे यांची ‘लक्षवेधी’

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. दर १५ तासाला एक शेतकरीमृत्यूला कवटाळत आहे. मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने मृत्यूचा घोट घेतल्याची घटना नुकतीच अंजनगाव सुर्जी तालुक्यात घडली. दुष्काळ, नापिकीने शेतकऱ्यांचा धीर खचत असल्याने जिल्ह्यास विशेष पॅकेज देण्याची मागणी आ. बळवंत वानखडे यांनी मंगळवारी सभागृहात केली.

जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने आ. वानखडे यांनी लक्षवेधी केली होती व मंगळवारी सकाळी यावर सभागृहात चर्चा झाली. जिल्ह्यात यंदा ११ महिन्यांत एकूण ३२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव नजिकच्या काळात निदर्शनास आलेले आहे. शासन व जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा, आजारपण, कुटुंबाचे संगोपन, यांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने समुपदेशनासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याउलट जिल्ह्यातील महाराष्ट्र बँक व अन्य बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी कोर्टाच्या नोटिसा पाठवत आहेत. खाती गोठवली जात आहेत. शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.

सभागृहात ‘लोकमत’च्या वृत्ताचा पुरावा

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. दै. 'लोकमत'ने यांची दखल घेत सातत्याने वृत्त प्रसिद्ध केल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले असल्याचे आ. बळवंत वानखडे यांनी सभागृहात सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला लोकमतने समोर आणल्याचे ते म्हणाले.

डीसीएम पालकमंत्री असताना शेतकरी अडचणीत

उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या शासनामार्फत विदर्भाच्या आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर कायमचा अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सिंचन सुविधा नसल्याने शेतकरी आत्महत्या

तत्कालीन प्रधानमंत्री, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी धामणगावला येऊन सिंचन अनुशेष दूर होण्यासाठी ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत सिंचन प्रकल्प मंजूर केले. यात दर्यापूर मतदारसंघातील चंद्रभागा, वाघाडी, सामदा सौंदळी या प्रकल्पांना सन २००९ मध्ये प्रशासकीय मंजुरी असताना अद्यापपर्यंत प्रकल्प अपूर्ण असल्याने ते म्हणाले.

शेतकऱ्यांना एकत्रित योजनांचा लाभ देणार

आ. वानखडे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना ना. शंभूराजे देसाई यांनी शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्जपुरवठा होण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात येतील. याशिवाय संबंधित विभागाच्या एकत्रित योजनेचा लाभ त्या- त्या जिल्ह्यास देण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केल्या जात असल्याचे ना. देसाई यांनी सभागृहात सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूEducationशिक्षण