शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने घेतला मृत्यूचा घोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:17 IST

लोकमतने मांडले वास्तव; आ. बळवंत वानखडे यांची ‘लक्षवेधी’

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. दर १५ तासाला एक शेतकरीमृत्यूला कवटाळत आहे. मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने मृत्यूचा घोट घेतल्याची घटना नुकतीच अंजनगाव सुर्जी तालुक्यात घडली. दुष्काळ, नापिकीने शेतकऱ्यांचा धीर खचत असल्याने जिल्ह्यास विशेष पॅकेज देण्याची मागणी आ. बळवंत वानखडे यांनी मंगळवारी सभागृहात केली.

जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने आ. वानखडे यांनी लक्षवेधी केली होती व मंगळवारी सकाळी यावर सभागृहात चर्चा झाली. जिल्ह्यात यंदा ११ महिन्यांत एकूण ३२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव नजिकच्या काळात निदर्शनास आलेले आहे. शासन व जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा, आजारपण, कुटुंबाचे संगोपन, यांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने समुपदेशनासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याउलट जिल्ह्यातील महाराष्ट्र बँक व अन्य बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी कोर्टाच्या नोटिसा पाठवत आहेत. खाती गोठवली जात आहेत. शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.

सभागृहात ‘लोकमत’च्या वृत्ताचा पुरावा

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. दै. 'लोकमत'ने यांची दखल घेत सातत्याने वृत्त प्रसिद्ध केल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले असल्याचे आ. बळवंत वानखडे यांनी सभागृहात सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला लोकमतने समोर आणल्याचे ते म्हणाले.

डीसीएम पालकमंत्री असताना शेतकरी अडचणीत

उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या शासनामार्फत विदर्भाच्या आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर कायमचा अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सिंचन सुविधा नसल्याने शेतकरी आत्महत्या

तत्कालीन प्रधानमंत्री, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी धामणगावला येऊन सिंचन अनुशेष दूर होण्यासाठी ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत सिंचन प्रकल्प मंजूर केले. यात दर्यापूर मतदारसंघातील चंद्रभागा, वाघाडी, सामदा सौंदळी या प्रकल्पांना सन २००९ मध्ये प्रशासकीय मंजुरी असताना अद्यापपर्यंत प्रकल्प अपूर्ण असल्याने ते म्हणाले.

शेतकऱ्यांना एकत्रित योजनांचा लाभ देणार

आ. वानखडे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना ना. शंभूराजे देसाई यांनी शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्जपुरवठा होण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात येतील. याशिवाय संबंधित विभागाच्या एकत्रित योजनेचा लाभ त्या- त्या जिल्ह्यास देण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केल्या जात असल्याचे ना. देसाई यांनी सभागृहात सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूEducationशिक्षण