शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

तेलबियाकडे शेतकऱ्यांची पाठ, रब्बीत गहू, हरभऱ्याकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 17:10 IST

यंत्रणेच्या उदासीनतेचा फटका; करडई, जवस, तीळ, सूर्यफुलाचे नाममात्र क्षेत्र

अमरावती : रब्बी हंगामाची लगबग सध्या सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कल गहू व हरभरा पेरणीकडे जास्त आहे. याशिवाय गळीत धान्य यामध्ये सूर्यफूल, जवस, तीळ व करडई या पिकांकडे पाठ असल्याचे दिसून येते. यंत्रणेची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र या दशकात कालबाह्य ठरत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे जमिनीत आर्द्रता जास्त आहे. याशिवाय सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे रब्बीसाठी आठ ते बारा पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केलेले आहे. याशिवाय भूजलस्तरात वाढ झाल्याने विहिरींद्वारेही सिंचन होणार आहेत. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात किमान दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये किमान ९० टक्के क्षेत्रात गहू व हरभराची पेरणी होत असल्याने अन्य पिके कालबाह्य ठरू लागली आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामासाठी ७,२८,८४९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ५,६३,४०९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ७७.३० टक्केवारी आहे.

ही आहेत कारणे

सिंचनासाठी अधिक पाणी लागणे, मजूर न मिळणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हंगामात भाव पडणे, सामूहिक पेरणी होत नसल्याने पक्ष्यांचा उपद्रव, उत्पादन खर्च अधिक असणे, अवकाळीमुळे नुकसान याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

असे आहे तेलबियांचे क्षेत्र

विभागात सद्यस्थितीत करडईची १,०८८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. याशिवाय जवस ४३ हेक्टर, तीळ ४७ हेक्टर, सूर्यफूल ४३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. खरीप हंगामातदेखील तेलबियांमध्ये फक्त सोयाबीन वगळता बाकी पिकांचे क्षेत्र देखील कमी झालेले आहे.

गहू, हरभराकडेच शेतकऱ्यांचा कल

विभागात सद्यस्थितीत ४,६०,१२८ हेक्टरमध्ये हरभरा व ८४,३५७ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. रब्बीत ९० टक्के क्षेत्र या दोन पिकांचे राहणार आहे. याशिवाय ज्वारी ८.०१८ व मक्याची ८,३०४ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. तेलबिया फक्त १,६३२ हेक्टरमध्ये आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी