शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तेलबियाकडे शेतकऱ्यांची पाठ, रब्बीत गहू, हरभऱ्याकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 17:10 IST

यंत्रणेच्या उदासीनतेचा फटका; करडई, जवस, तीळ, सूर्यफुलाचे नाममात्र क्षेत्र

अमरावती : रब्बी हंगामाची लगबग सध्या सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कल गहू व हरभरा पेरणीकडे जास्त आहे. याशिवाय गळीत धान्य यामध्ये सूर्यफूल, जवस, तीळ व करडई या पिकांकडे पाठ असल्याचे दिसून येते. यंत्रणेची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र या दशकात कालबाह्य ठरत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे जमिनीत आर्द्रता जास्त आहे. याशिवाय सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे रब्बीसाठी आठ ते बारा पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केलेले आहे. याशिवाय भूजलस्तरात वाढ झाल्याने विहिरींद्वारेही सिंचन होणार आहेत. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात किमान दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये किमान ९० टक्के क्षेत्रात गहू व हरभराची पेरणी होत असल्याने अन्य पिके कालबाह्य ठरू लागली आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामासाठी ७,२८,८४९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ५,६३,४०९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ७७.३० टक्केवारी आहे.

ही आहेत कारणे

सिंचनासाठी अधिक पाणी लागणे, मजूर न मिळणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हंगामात भाव पडणे, सामूहिक पेरणी होत नसल्याने पक्ष्यांचा उपद्रव, उत्पादन खर्च अधिक असणे, अवकाळीमुळे नुकसान याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

असे आहे तेलबियांचे क्षेत्र

विभागात सद्यस्थितीत करडईची १,०८८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. याशिवाय जवस ४३ हेक्टर, तीळ ४७ हेक्टर, सूर्यफूल ४३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. खरीप हंगामातदेखील तेलबियांमध्ये फक्त सोयाबीन वगळता बाकी पिकांचे क्षेत्र देखील कमी झालेले आहे.

गहू, हरभराकडेच शेतकऱ्यांचा कल

विभागात सद्यस्थितीत ४,६०,१२८ हेक्टरमध्ये हरभरा व ८४,३५७ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. रब्बीत ९० टक्के क्षेत्र या दोन पिकांचे राहणार आहे. याशिवाय ज्वारी ८.०१८ व मक्याची ८,३०४ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. तेलबिया फक्त १,६३२ हेक्टरमध्ये आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी