शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एरड येथील शेतक-यांनी कपाशीत घातला ट्रॅॅक्टर, पिकाने शेतक-यांना लावले देशोधडीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 9:33 PM

अमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे

धीरेंद्र चाकोलकर अमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे. एकरी २० क्विंटल उत्पादन आणि दोन वर्षांपूर्वी हाती एक लाख रुपये रोख देणारे पीक असलेली, पाच फुटांच्यावर वाढलेली बीटी प-हाटी बोंडअळीच्या उत्पातामुळे उपटूून टाकण्याचा निर्णय एरड येथील शेतक-यांनी घेतला. त्यानुसार येथील भूषण देशमुख यांनी ड्रिपवर वाढविलेली अडीच एकरांतील प-हाटी मोडून टाकली. ते वडिलांच्या नावे असलेली शेती पाहतात. त्यांना दरवर्षी एकरी २० क्विंटल कापूस हमखास होतो.यावर्षी त्यांनी बीजी-२ प्रकाराचे कपाशी बियाणे लावले. कापूस घरी येईपर्यंत ४० हजार रुपये खर्च केले. ५० क्विंटलचा अंदाज असताना आतापर्यंत अवघा पाच क्विंटल कापूस घरी आला आहे. हीच परिस्थिती गावातील अनेक शेतकरी अनुभवत आहेत. शेतातील प-हाटी हिरवीगार असली तरी अळीमुळे बोंडांच्या कवड्या झाल्या आहेत. फरदडची वाट पाहण्याऐवजी झाडे उपटण्याचा निर्णय घेऊन देशमुख यांनी पिकात ट्रॅक्टर घातला. त्याकरिता आता त्यांना ३००० रुपये लागतील, तर गोळा करण्यासाठी २००० रुपये मजुरांना द्यावे लागतील. प-हाटी तशीच उभी ठेवली, तर अळी प्रादुर्भाव पुढील वर्षीही होण्याची शक्यता आहे.गतवर्षापर्यंत एक-एक मजूर स्त्री कापसाची वेचाई करताना दिवसाला २० किलोचे गाठोडे घरी आणत होती. काही शेतक-यांनी एकरी २५ क्विंटल कापूस उत्पादनाचा आकडा गाठला. यंदा आतापर्यंत पाच क्विंटल कापूस घरी आला. या कापसातून मोठी रक्कम वेचाईची मजुरी देण्यातच जाणार आहे, असे भूषण देशमुख यांनी सांगितले. कापसापूर्वी २० क्विंटल सोयाबीन देशमुख यांनी अवघ्या ३६ हजारांत विकले. त्यातून काहीच हाती आले नाही, अशी त्यांची खंत आहे.कापसासाठी एरड प्रसिद्धच्कापसाच्या एकरी २०-२५ क्विंटल उत्पादन एरड येथे घेतले जाते. या भरवशाच्या पिकातूनच येथील शेतक-यांनी समृद्धी मिळविली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, यंदा कासपाने फसगत केली. तालुका कृषी अधिका-यांनी पाहणी केली. यासंदर्भात जिल्हास्तरावर एसएओ आॅफिसवर गावातील आठ जणांच्या तक्रारी गेल्या आहेत. तथापि, या कार्यालयाकडून अद्याप पाहणी झालेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाईची शक्यता मावळल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.भावाचीही मारामारबोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या कापसाला दोन हजारांच्या खालीच मागणी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कापूस बाजार समितीत न्यायचा, तर १०० रुपये क्विंटलने वाहतूक खर्च व रोख रकमेसाठी दलालाकडून काही कपात होते. मी अमृतराव देशमुख पॅटर्नचा अवलंब करीत ड्रिपवर प-हाटी वाढविली. हिरवीगार प-हाटी मोडताना वेदना झाल्या. गावातील इतरही शेतकरी याच निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. घेतलेले कष्ट वाया गेले आहेत.- भूषण देशमुख, प्रगतिशील शेतकरी, एरड