शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने कोट्यवधीचे नुकसान मिळाला, रुपयाही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

पाठपुरावा सुरूच, तीन वर्षांत अतिवृष्टीने जिल्ह्यात कोट्यवधीची हानी अमरावती : शेती आणि नैसर्गिक प्रकोपसारखा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत. यातून ...

पाठपुरावा सुरूच, तीन वर्षांत अतिवृष्टीने जिल्ह्यात कोट्यवधीची हानी

अमरावती : शेती आणि नैसर्गिक प्रकोपसारखा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न शासकीय मदतीमधून करण्यात येतो, असे प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगितले जाते. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही थोडीथोडकीच मदत शेतकऱ्यांच्या हातात पडते. त्यातून मजुरीचा खर्चही निघत नाही. मात्र, शासकीय आकडेवारी सामूहिकरीत्या जाहीर झाल्याने खूप मोठी मदत दिल्याचे दिसते. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात कवडीमोल पैसा येतो. नुकसान झाल्यानंतर अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. माहिती मिळण्यासाठी त्यातील दहा टक्के रक्कम खर्च होते आता शासनाने नुकसान ग्रस्त भागात शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याची गरज आहे.

बॉक्स

अतिवृष्टी झालेल्या नुकसानाचे पाठविलेले प्रस्ताव

२०१७-००-००

२०१८-००.००

२०१९-१२.६०-००

२०२०-९२.७७-००

२०२१-१६.६२-००

प्रस्ताव कोटीत

मिळालेले कोटीत

बॉक्स

नुकसानानंतर पाहावी लागते मदतीची वाट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे. नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही. येणारी मदत फार उशिरा आणि टप्प्याटप्प्याने ते विशेष म्हणजे सरकारच्या निकषात केवळ हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदतीचा लाभ दिला जातो. मुळात नुकसान यापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मदतीनंतरही शेतकरी उभा राहू शकत नाही.

बॉक्स

सरकार बदलले, परिस्थिती सारखीच

सरकार बदलल्यानंतर धोरणात्मक निर्णयात बदल होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मुळात कुठलीही सरकार आल्यानंतर परिस्थिती सारखीच राहिली आहे. यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आजपर्यंत संकटातून बाहेर पडू शकले नाही. त्यासाठी ठोस मोबदल्याची आवश्यकता आहे.

बॉक्स

लोकप्रतिनिधी म्हणतात

जिल्ह्यात सतत नैसर्गिक प्रकोप सुरू राहत आहे. यावर्षी अतिपावसाने पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. पिकांच्या नुकसानासह रस्ते, पुलाचेही नुकसान झाले. या नुकसानभरपाई व रस्ते पुल दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी मिळावा, याकरीता प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी पालकमंत्र्याच्या माध्यामातून मिळविण्यासाठी प्रयन्न सुरू आहे.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद, अमरावती

कोट

माझ्या कार्यकाळात नुकसानभरपाईची मागणीसाठी संबंधित विभागामार्फत शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. अशातच यात काही प्रमाणात निधी मिळाला. मात्र, उर्वरित निधीही पालकमंत्र्याच्या सहकाऱ्याने जिल्हा परिषदेला मिळेल, यात काही शंका नाही. त्यासाठी विद्यमान अध्यक्ष, पालकमंत्री हे पाठपुरावा करतील.

- नितीन गोंडाणे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद