शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

आंबे पिकविण्यासाठी इथिलिन स्प्रे, चायनिज पावडरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:52 IST

आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे.

ठळक मुद्दे आरोग्याला घातक : फळांचा राजा घेऊन आला आजार मोफत; प्रमाणापेक्षा जास्त वापर धोकादायक

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे. त्यामुळे आंब्यासोबत प्रत्येकाच्या घरात आजार मोफत जात असल्याने आरोग्य सांभाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात विविध राज्यांतून दररोज शेकडो क्विंटल आंबे येतात. याच ठिकाणी सकाळी त्यांचा लिलाव होतो. ठोक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यावसायिक सदर आंब्याची खरेदी करतात. या साखळीत आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रेचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रे वैध असल्याचे व तशी परवानगी सुध्दा असल्याचे व्यावसायिक सांगतात. त्याचे प्रमाण १०० पीपीएम (पार्ट पर मिलियन) एवढा ठरले आहे. मात्र, आंबे झटपट पिकवून बाजारात विकण्यासाठी यापेक्षा जास्त प्रमाणात इथिलिनचा वापर केला जातो. व्यापाऱ्यांकडून दुसºया दिवशीच आंबे पिकले पाहिजे, असे नियोजन केले जाते. त्यामुळे १०० पीपीएम पेक्षा जास्त् इथिलिन स्प्रेचा वापर केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.पूर्वी कॅल्शियम कार्बाइडने सर्रास आंबे पिकविण्यासाठी वापर करण्यात येत होता. आताही तो छुप्या पद्धतीने करण्यात येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र, याची जागा चायनिज पुड्यांनी घेतली आहे. यामध्ये सुद्धा कार्बाइड असते. आंब्याच्या एका कॅरेटमध्ये ती टाकली व वरून पेपर रद्दी टाकली की, आंबे पिकतात, असे एका व्यावसायिकाने सांगितले.सतत जास्त प्रमाणात इथिलिन स्प्रे, पावडर व कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे सेवन केले, तर कर्करोगासारखा घातक आजारही होऊ शकतो. दुर्दैवाने यावर नियंत्रण ठेवण्याकडे अन्न व प्रशासन विभागाने दुर्लक्ष केले आहे.५० पेक्षा जास्त फळ व्यापारीअमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात नोंदणीकृत ५० पेक्षा जास्त फळांचे व्यापारी आहेत. त्यांच्यामार्फत विविध फळांची विक्री करण्यात येते. उन्हाळ्यात आंबे विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शहरातील पाचशेपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते या ठोक व्यापाºयांकडून आंबे विकत घेऊन शहरातील विविध चौकांत विक्री करीत असल्याची माहिती आहे. पिवळेधम दिसणारे हे आंबे हे रसायनांनी पिकविले जात असल्याने शरीरासाठी घातक ठरतात. ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.