शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

आंबे पिकविण्यासाठी इथिलिन स्प्रे, चायनिज पावडरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:52 IST

आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे.

ठळक मुद्दे आरोग्याला घातक : फळांचा राजा घेऊन आला आजार मोफत; प्रमाणापेक्षा जास्त वापर धोकादायक

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे. त्यामुळे आंब्यासोबत प्रत्येकाच्या घरात आजार मोफत जात असल्याने आरोग्य सांभाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात विविध राज्यांतून दररोज शेकडो क्विंटल आंबे येतात. याच ठिकाणी सकाळी त्यांचा लिलाव होतो. ठोक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यावसायिक सदर आंब्याची खरेदी करतात. या साखळीत आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रेचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रे वैध असल्याचे व तशी परवानगी सुध्दा असल्याचे व्यावसायिक सांगतात. त्याचे प्रमाण १०० पीपीएम (पार्ट पर मिलियन) एवढा ठरले आहे. मात्र, आंबे झटपट पिकवून बाजारात विकण्यासाठी यापेक्षा जास्त प्रमाणात इथिलिनचा वापर केला जातो. व्यापाऱ्यांकडून दुसºया दिवशीच आंबे पिकले पाहिजे, असे नियोजन केले जाते. त्यामुळे १०० पीपीएम पेक्षा जास्त् इथिलिन स्प्रेचा वापर केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.पूर्वी कॅल्शियम कार्बाइडने सर्रास आंबे पिकविण्यासाठी वापर करण्यात येत होता. आताही तो छुप्या पद्धतीने करण्यात येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र, याची जागा चायनिज पुड्यांनी घेतली आहे. यामध्ये सुद्धा कार्बाइड असते. आंब्याच्या एका कॅरेटमध्ये ती टाकली व वरून पेपर रद्दी टाकली की, आंबे पिकतात, असे एका व्यावसायिकाने सांगितले.सतत जास्त प्रमाणात इथिलिन स्प्रे, पावडर व कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे सेवन केले, तर कर्करोगासारखा घातक आजारही होऊ शकतो. दुर्दैवाने यावर नियंत्रण ठेवण्याकडे अन्न व प्रशासन विभागाने दुर्लक्ष केले आहे.५० पेक्षा जास्त फळ व्यापारीअमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात नोंदणीकृत ५० पेक्षा जास्त फळांचे व्यापारी आहेत. त्यांच्यामार्फत विविध फळांची विक्री करण्यात येते. उन्हाळ्यात आंबे विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शहरातील पाचशेपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते या ठोक व्यापाºयांकडून आंबे विकत घेऊन शहरातील विविध चौकांत विक्री करीत असल्याची माहिती आहे. पिवळेधम दिसणारे हे आंबे हे रसायनांनी पिकविले जात असल्याने शरीरासाठी घातक ठरतात. ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.