शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेतात वापरण्यात येणा-या रासायनिक पदार्थांचा त्वचेवर परिणाम, कंटाळून शेतक-याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 1:09 PM

रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे.

बेनोडा शहीद (अमरावती) - रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे.  विजय मडावी (वय 55 वर्ष)असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्वचारोगाला कंटाळून त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते त्वचारोगने त्रस्त होते.  धक्कादायक बाब म्हणजे शेतात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांचा विजय मडावी यांच्या त्वचेवर परिणाम झाला असावा, अशी चर्चा संपूर्ण परिसरात आहे. यालाच कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचंही बोलले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  लोणी ते आलोडा रोडवरील प्रभाकर पाटील यांच्या शेताजवळ विजयचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विजयचे हात व पाय त्वचारोगामुळे सुजले होते. अनेक इलाज करुन ते थकले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेतात काम करताना त्यांना त्वचारोग उद्भवला. या आजारामुळे ते त्रासले होते. आजारापणालाच कंटाळून वडिलांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचा जबाब त्यांचा मुलगा विपुल याने पोलिसांना दिला. पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, पीएसआय भरत लसंते यांचे मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल राजू धुर्वे व त्यांचे पथक करत आहेत.

यवतमाळमध्ये फवारणीचे १८ बळी, ‘त्या’ शेतक-यांच्या मृत्यूची चौकशी

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे तीन महिन्यांत १८ शेतक-यांचा बळी गेला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने या प्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृह सचिवांकडून चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. पीडित कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांची मदत सरकारने जाहीर केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘सेफ्टी किट’ वितरित करण्याचे बंधन कीटकनाशक कंपन्यांवर घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. विमा योजनेसाठी अपात्र किंवा तांत्रिक कारणाने विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकणा-या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. फवारणीबाबत कृषी विभागातर्फे जनजागरण मोहीम हाती घेण्यात येईल.विषबाधा प्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला आहे. फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालणार आहे. - पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

टॅग्स :Farmerशेतकरी