शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाची गंभीर स्थिती,१३४ तालुक्यांमध्ये भूजल निर्देशांक माघारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 22:29 IST

राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे.

 - गजानन मोहोड 

अमरावती  - राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे. भुजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षण विहिरीच्या नोंदीची यापूर्वीच्या १० वर्षांच्या भूजलपातळीशी तुलना केली असता हे निरीक्षण नोंदविण्यात आले. यामध्ये सात तालुक्यात अतीगंभीर, ४२ तालुक्यात गंभीर तर  स्वरूपाचा तर ८५ तालुक्यात मध्यम स्वरुपात भुजलात कमी आलेली आहे.नव्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यासोबत पिकांचे क्षेत्रिय सर्वेक्षण विचारात घेतल्या जाते. अनिवार्य निर्देशांकामुळे २०१ तालुक्यांत दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागल्यानंतर या सर्व तालुक्यात मृदु आर्द्रता निर्देशांकानुसार दुष्काळाची क्रमवारी निश्चित करण्यात आली. त्यानंतरच्या जलविषयक निर्देशांकांमध्ये राज्यातील सर्व जलसाठ्या संदर्भात पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे मुल्यमापन करण्यासाठी भूजल पातळी निर्देशांकाचा वापर करण्यात आला. त्यानुुसार राज्याच्या ३३ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यातील भूजल पातळीचे निरीक्षण विहिरीतील पातळीच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये हा धक्कादायक नित्कर्ष नोंदविण्यात आला. या ठिकाणी आता चाºयाची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगाराची वाढती मागणी व रोजगारासाठी लोकांचे स्थलांतर आदी विषयक माहिती सबंधित जिल्ह्यांकडून मागविण्यात येणार आहे

भूजल पातळी निर्देशांकानुसार बाधित तालुकेराज्यात ३५१ तालुक्यापैकी २१७ तालुक्यात स्थिती सामान्य आहे. मात्र, १३४ तालुक्यातील भुजलस्तर कमी झालेला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुके, अकोला २, अमरावती ३, औरंगाबाद ३, बीड ८, बुलडाणा ९, चंद्रपूर ४, धुळे १, जळगाव ३ जालना ४, लातूर ४, नागपूर ६, नांदेड ३, नंदूरबार ४, नाशिक ७, उसमानाबाद ८, परभनी २, पुणे ७, रायगड ११, रत्नागिरी ३, सांगली ७, सातार २, सिंधुदूर्ग १, सोलापूर ११, ठाणे/पालघर १३, वर्धा १व यवतमाळ जिल्ह्यातील १ तालुका भूजल पातळी निर्देशांकात माघारला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र