शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धान्य बाजारावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: March 8, 2015 00:05 IST

शेतकऱ्यांना झालेले अल्प उत्पन्न, वाढलेला वाहतूक खर्च त्यामुळे शेतकरी खर्चापूरतेच धान्य बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.

अमरावती : बँंकेचे कर्ज एकरकमी परत द्यावे लागत असल्याने आता बहुतांश शेतकरी शेती हंगामासाठी बचत गटातून कर्ज घेत आहेत. त्यामुळे बचत गट शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत.निपाणी देवरी येथील ६८ वर्षीय शेतकरी लक्ष्मण कोसमकार यांच्याकडे ४ एकर शेती आहे. दरवर्षी उत्पादन खर्च वजा जाता काहीच उरत नसून २०१४ मध्ये त्यांनी खरीप पिकांसाठी बचतगटाकडून २० हजार रुपये कर्ज घेतले. त्याआधारे सोयाबीन, तुरीची लागवड केली. मात्र, ऐन फुलोरावर सोयाबीनचे पीक असताना पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. तसेच तूर पिकावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पिकही बुडाले. त्यामुळे कोसमकार यांना बचतगटाचे कर्ज फेडणे अशक्य होते. मात्र महिन्याचे व्याज वरचेवर भरल्याने मुद्दल देण्यासाठी अवधी मागितला. नंतर पैशाची तडजोड करून रबी हंगामात दोन एकरात हरभऱ्याची पेरणी केली. त्यातही हरभरा संवगणीदरम्यान वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मोठी फजिती झाली. पण पर्याय नव्हता. कारण खरीप पीक बुडाले. कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. ही भिस्त हरभरा पिकावर असल्याने धावपळीत नियोजन केले. मळणीयंत्र बोलावून हरभरा काढला. ज्यांनी संकटात हातभार लावला त्याचे देणे अगत्याचे समजून थेट मशीनमधून काढलेला हरभरा अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणला आहे. (प्रतिनिधी)मासिक व्याजदराची सवलतबचत गटापेक्षा बँकेचे कर्ज का घेत नाही, असे शेतकरी कोसमकार यांना विचारले असता ते म्हणाले, बँकेचे कर्ज घेतल्यास एकदम व्याजासह द्यावे लागतात. एकतर निसर्गाची साथ नाही. त्यामुळे जेमतेम हाती आलेले पीक तोकडे, त्यात बँकेची एकरकमी द्यावी लागणारी देणी अशक्य होते. म्हणूनच बचत गटाकडून कर्ज घेणे परवडते.एका मुलाचा आधारलक्ष्मणराव कोसमकार यांना दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा यवतमाळ येथे बसस्थानकावर गोळ्या-बिस्किटे विकून आपल्या संसाराचा गाडा हाकतो. त्यामुळे ते मदत करू शकत नाही. उलट आम्हीच त्याला देतो. दुसरा मुलगा अमरावतीत येऊन गवंडी काम करतो. त्याच्या मजुरीवर घरखर्च चालते. सत्तरीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर या मुलाच्या आधारे शेतीची कामे करीत आहे, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.