शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

विदर्भातील 54 तालुक्यात मोबाइल अॅपद्वारे दुष्काळाचे सर्वेक्षण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 17:39 IST

प्रत्येक तालुक्यातील 10 गावे रँडम पद्धतीने निवडणार

गजानन मोहोडअमरावती - सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्याचा खंड यामुळे विदर्भातील 54 तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील 22, तर अमरावती विभागातील 31 तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरसाठी संबंधित तालुक्यांतील 10 गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार आहे. कृषी आयुक्तांनी याविषयीचे निर्देश देऊन 21 ऑक्टोबरच्या आत अहवाल मागितला आहे.

शासनाने आता दुष्काळ घोषित करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2017 च्या निकषाप्रमाणे नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरिपाचा दुष्काळ 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. विदर्भातील 10 तालुक्यात सरासरीपेक्षा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. या तालुक्यात रँडम पद्धतीने 10 गावे जिल्हाधिकारी निश्चित करतील व गावातील प्रमुख पिकांचा सर्व्हे/गट नंबर ठरविताना गावातील एकूण सर्व्हे व गट नंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे. या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे. हे पीक एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्याची खात्री करण्यात येणार आहे. या गटामधील पीक, शेतकऱ्यांची माहिती, पिकाची सद्यस्थिती, पिकांचे फोटो याविषयीची माहिती मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करावी लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी करण्यापूर्वी अशाप्रकारे सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरअखेर शासन खरिपाचा दुष्काळ जाहीर करणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळVidarbhaविदर्भMobileमोबाइल