शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

समृद्धी महामार्गामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:00 AM

तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन एकर शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली. परंतु, एक रूपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे उपोषण सुरू : निवेदनाला केराची टोपली

वाढोणा रामनाथ : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून गेलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामात आजूबाजूच्या शेतजमिनीजवळील रपटे, धुरे, नाल्या नष्ट झाले. पावसाने थैमान घातल्याने जमिनीतील संपूर्ण माती पिकांसह वाहून गेली. यामुळे लोहगाव, पिंपळगाव आणि खेड शिवारात पिकांचे आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तीनही गावांतील शेतकरी सोमवारपासून महामार्गावरच उपोषण करीत आहेत.तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन एकर शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली. परंतु, एक रूपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. राजेश सानप, संतोष कांबळे, संतोष शेळके, लता शेळके, किसनराव राऊत, ज्ञानेश्वर राऊत, कमलाबाई फड, नितीन तट्टे, आनंदा बन्सोड, बादल इंगळे, रामजीवन बोबडे, सुनील काळे, प्रमोद सानप, प्रवीण चौधरी, अरविंद फड, उत्तमराव काळे, रामभाऊ वैद्य, अमित बन्सोड आदी शेतकरी उपोषण करीत आहेत.शासननिर्णयानुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला होता. परंतु, तो त्यांना मान्य नाही. दोन वेळा सर्वेक्षण झाले; परंतु शेतकरी मागणीवर कायम आहेत.- गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी