शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा ‘अ’ व्यवस्थापनाने शहर गारद !

By admin | Updated: May 6, 2017 00:07 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गुरुवारी देशातील ४३४ स्वच्छ शहरांची क्रमवारी घोषित करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण - २०१७ : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने नामुष्की प्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गुरुवारी देशातील ४३४ स्वच्छ शहरांची क्रमवारी घोषित करण्यात आली. यात मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत क्वालिटी काऊंसिल आॅफ इंडियाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. त्यापैकी ४३४ स्वच्छ शहरांची यादी गुरुवारी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी घोषित केली. या स्वच्छ शहरांच्या यादीत ‘आपले अमरावती’शहर तब्बल २३१ व्या क्रमांकावर आले. राज्यातील नवी मुंबई वगळता इतर शहरांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. अमरावती शहर तर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आणि अंमलबजावणी करू न शकल्याने स्वच्छ सर्वेक्षणात गारद झाले.केंदी्रय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने क्वालिटी काऊंसिल आॅफ इंडियाने हे सर्वेक्षण केले. एकूण २ हजारांपैकी गुण देऊन सर्वेक्षण केलेल्या शहरांची क्रमवारी ठरविण्यात आली.यापैकी ९०० गुण स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामकाजाला ,५०० गुण केंद्राच्या स्वच्छता पथकाने केलेल्या निरिक्षणास आणि ६०० गुण नागरिकांनी स्वच्छतेवर दिलेल्या प्रतिक्रियांना ठेवण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापनासाठी यात ४०० गुण ठेवण्यात आले होते. संकलित केलेल्या घनकचऱ्यावर करण्यात येणारी प्रक्रिया आणि विल्हेवाट असे घटक त्यात अंतर्भूत होते.क्युसिआयच्या पथकाने घनकचरा व्यस्थापन प्रकल्पाबाबत विचारणाही केली होती. मात्र हा प्रकल्प गर्भातच गारद झाला.किमानपक्षी कार्यारंभ आदेश दिल्या गेले असते तर ४०० पैकी ३०० च्या आसपास गुण मिळविणे शक्य होते. मात्र हा घनकचरा व्यवस्थापनाबाबत महापालिका बॅकफुटवर आल्याने हे गुण शहर मिळवू शकले नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे गुण मिळाले असते तर शहराच्या गुणांकनात वाढ होऊ शकली असती.मात्र तसे होऊ शकले नाही.याशिवाय १७ ते १९ जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या क्युुसीआयच्या तपासणीदरम्यान वैयक्तिक तथा सामुदायिक शौचालयाची उभारणी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. सर्वेक्षणादरम्यान महापालिकेने राबविलेल्या स्वच्छताविषयक कामकाजासह सार्वजनिक स्थळावरच्या अस्वच्छतेची आवर्जून दखल घेण्यात आली. घराघरांतून कचरा संकलनाची प्रक्रिया महापालिकेकडून करण्यात येत असली तरी तो कचरा कंटेनर आणि त्या भोवताल इतस्तत: पसरत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.स्वच्छ सर्वेक्षणात नापास झाल्यानंतर का होईना महापालिकेने स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.