शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पाऊस, गारपिटीने १०० हेक्टरातील पिके बाधित; वीज पडून दोन गाई मृत, दोन घरांचे नुकसान  

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 18, 2023 17:14 IST

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

अमरावती : शनिवारी पहाटे वीज,वादळासह झालेल्या पावसाने किमान १०० हेक्टरमधील गहू, हरभरा व संत्रा पिकाचे नुकसान झाले. याशिवाय वीज कोसळल्याने चांदूर रेल्वे तालुक्यात दोन गाईंचा मृत्यू झाला, तर अचलपुरात दोन घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळीचे संकट आहे, अजून चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. अवकाळीच्या शक्यतेने काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्याची सवंगणी व मळणी केल्याने बहुतांश शेतकरी या संकटातून बचावले आहेत. तरीही उशिरा पेरणी झालेला गहू, हरभऱ्याला याचा फटका बसला. याशिवाय संत्रा, लिंबूची फळगळ झाल्याचे दिसून येते.

जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड शिवारात रात्री वादळासह झालेली गारपीट व पावसाने काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेल्या आहे. याशिवाय तालुक्यात वीज अंगावर पडल्याने दोन गाई दगावल्या व अचलपूर तालुक्यात दोन घरांची पडझड झालेली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामानenvironmentपर्यावरणFarmerशेतकरीAmravatiअमरावतीagricultureशेती