शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

पीक विमा भरपाईत कंपनीचेच चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला.

ठळक मुद्देदुष्काळस्थितीत १०९.४१ कोटींचा प्रीमियम कंपनीकडे भरणा, भरपाई मात्र, ६२.६३ कोटींची

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याची पैसेवारी ४७ असल्याने सर्व तालुक्यांत दुष्काळस्थिती असताना विमा कंपनीच्या लेखी मात्र, ऑलवेल आहे. खरीप २०२० च्या हंगामात कंपनीकडे १,८५,६०१ शेतकऱ्यांचा १०९ कोटी ४१ लाख ९७ हजार ८२२ रुपयांचा प्रीमियमचा भरणा करण्यात आला होता. पिकांच्या प्रतिकुल परिस्थितीतही विमा कंपनीद्वारा फक्त ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी ६३ लाख ३२ हजार १२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही शुद्ध फसवणूक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला. याशिवाय राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ४६,८७,८६,७९५ असे एकूण १०९,४१,९७,८२२ रुपयांचा प्रिमियम कंपनीकडे जमा करण्यात आलेला आहे. कंपनीद्वारा मात्र, ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२,६३,३२,०१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मागील हंगामात सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सारखी अल्पावधीतील पिके बाद झाली होती. त्यानंतर ऑगस्टपासून पावसाने रिपरीप लावली ती नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक जाग्यावरच सडले. याशिवाय गंजीदेखील पावसाने खराब झाल्या. संपूर्ण सोयाबीनचे पीक उद्ध्वद्वस्त झाले. याशिवाय सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडाला बुरशीजन्य रोगामुळे बोंडसड झाली. गुलाबी बोंडअळीनेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाचे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाद्वारा ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली. या नुकसानाकरिता शासनाद्वारा ३,१४,८७० हेक्टर पिकासाठी ३३७.०६ कोटींची भरपाई देण्यात आली. कंपनीद्वारा मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

अशी आहे तालुकानिहाय भरपाईअचलपूर तालुक्यात ७५,७८,३२५ रुपये, अमरावती १,५६,९७,४७२ रुपये, अंजनगाव सुर्जी ४ १४,००,२८९ रुपये, भातकुली २,०३,९७,१४२ रुपये, चांदूर रेल्वे २,३६,७८,१८१ रुपये, चांदूरबाजार २,१९,१०,२०९ रुपये, चिखलदरा ३६,८९,७७८, दर्यापूर ३२,९८,८६,८५१ रुपये, धामणगाव १ ९०,३१,७६१ रुपये, धारणी  १,०४,६४,८४६ रुपये, मोर्शी ७ २२,४३,९६३ रुपये, नांदगाव १,२७,९४,४९८ रुपये, तिवसा ३,८२,४६,९३३ रुपये व वरूड तालुक्यात ९३,११,७९४ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांना ३.१८ कोटीपरतीच्या पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्याकरिता ३,५९८ शेतकऱ्यांना ३,१८,९९,०३१ रुपयांची भरपाई देण्यात आालेली आहे. यात कपाशीसाठी फक्त ३३८ शेतकऱ्यांना २५,०७,२५५ रुपये, सोयाबीनसाठी २,५२६ शेतकऱ्यांना२,६८,७५,६०९ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे. याशिवाय उडदाला ३,८९,९८० व मुंगासाठी १२,४२,३३३ रुपयांची भरपाई दिलेली आहे.

काढणीपश्चात नुकसान, ७०२ शेतकऱ्यांना भरपाईपिकाच्या संवगणीनंतर परतीच्या पावसाने सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. यात ६९४ शेतकऱ्यांना १,१४,३६,२७५ रुपयांची भरपाई विमा कंपनीद्वारा देण्यात आलेली आहे. याशिवाय कपाशीसाठी सहा शेतकऱ्यांना ३३,२५३, धानासाठी एका शेतकऱ्याला ९,१५१ रुपये याशिवाय तुरीसाठी एका शेतकऱ्याला ६,६४० रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

पीक विम्यात बीड पॅटर्न कोठे?पीक विम्याच्या भरपाईत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे बीड जिल्ह्याचा पॅटर्न राबविण्याची विनंती केल्याचे कृत्रिमंत्री दादाजी भुसे यांनी मागील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर असताना सांगितले होते. यात १० प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा घेऊन कंपनीद्वारा ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, प्रत्यक्षात मात्र, असे काहीही झालेले नाही.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती