शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरपाईत कंपनीचेच चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला.

ठळक मुद्देदुष्काळस्थितीत १०९.४१ कोटींचा प्रीमियम कंपनीकडे भरणा, भरपाई मात्र, ६२.६३ कोटींची

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याची पैसेवारी ४७ असल्याने सर्व तालुक्यांत दुष्काळस्थिती असताना विमा कंपनीच्या लेखी मात्र, ऑलवेल आहे. खरीप २०२० च्या हंगामात कंपनीकडे १,८५,६०१ शेतकऱ्यांचा १०९ कोटी ४१ लाख ९७ हजार ८२२ रुपयांचा प्रीमियमचा भरणा करण्यात आला होता. पिकांच्या प्रतिकुल परिस्थितीतही विमा कंपनीद्वारा फक्त ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी ६३ लाख ३२ हजार १२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही शुद्ध फसवणूक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला. याशिवाय राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ४६,८७,८६,७९५ असे एकूण १०९,४१,९७,८२२ रुपयांचा प्रिमियम कंपनीकडे जमा करण्यात आलेला आहे. कंपनीद्वारा मात्र, ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२,६३,३२,०१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मागील हंगामात सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सारखी अल्पावधीतील पिके बाद झाली होती. त्यानंतर ऑगस्टपासून पावसाने रिपरीप लावली ती नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक जाग्यावरच सडले. याशिवाय गंजीदेखील पावसाने खराब झाल्या. संपूर्ण सोयाबीनचे पीक उद्ध्वद्वस्त झाले. याशिवाय सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडाला बुरशीजन्य रोगामुळे बोंडसड झाली. गुलाबी बोंडअळीनेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाचे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाद्वारा ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली. या नुकसानाकरिता शासनाद्वारा ३,१४,८७० हेक्टर पिकासाठी ३३७.०६ कोटींची भरपाई देण्यात आली. कंपनीद्वारा मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

अशी आहे तालुकानिहाय भरपाईअचलपूर तालुक्यात ७५,७८,३२५ रुपये, अमरावती १,५६,९७,४७२ रुपये, अंजनगाव सुर्जी ४ १४,००,२८९ रुपये, भातकुली २,०३,९७,१४२ रुपये, चांदूर रेल्वे २,३६,७८,१८१ रुपये, चांदूरबाजार २,१९,१०,२०९ रुपये, चिखलदरा ३६,८९,७७८, दर्यापूर ३२,९८,८६,८५१ रुपये, धामणगाव १ ९०,३१,७६१ रुपये, धारणी  १,०४,६४,८४६ रुपये, मोर्शी ७ २२,४३,९६३ रुपये, नांदगाव १,२७,९४,४९८ रुपये, तिवसा ३,८२,४६,९३३ रुपये व वरूड तालुक्यात ९३,११,७९४ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांना ३.१८ कोटीपरतीच्या पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्याकरिता ३,५९८ शेतकऱ्यांना ३,१८,९९,०३१ रुपयांची भरपाई देण्यात आालेली आहे. यात कपाशीसाठी फक्त ३३८ शेतकऱ्यांना २५,०७,२५५ रुपये, सोयाबीनसाठी २,५२६ शेतकऱ्यांना२,६८,७५,६०९ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे. याशिवाय उडदाला ३,८९,९८० व मुंगासाठी १२,४२,३३३ रुपयांची भरपाई दिलेली आहे.

काढणीपश्चात नुकसान, ७०२ शेतकऱ्यांना भरपाईपिकाच्या संवगणीनंतर परतीच्या पावसाने सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. यात ६९४ शेतकऱ्यांना १,१४,३६,२७५ रुपयांची भरपाई विमा कंपनीद्वारा देण्यात आलेली आहे. याशिवाय कपाशीसाठी सहा शेतकऱ्यांना ३३,२५३, धानासाठी एका शेतकऱ्याला ९,१५१ रुपये याशिवाय तुरीसाठी एका शेतकऱ्याला ६,६४० रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

पीक विम्यात बीड पॅटर्न कोठे?पीक विम्याच्या भरपाईत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे बीड जिल्ह्याचा पॅटर्न राबविण्याची विनंती केल्याचे कृत्रिमंत्री दादाजी भुसे यांनी मागील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर असताना सांगितले होते. यात १० प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा घेऊन कंपनीद्वारा ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, प्रत्यक्षात मात्र, असे काहीही झालेले नाही.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती