शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

राज्यात १६ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; दिवाळी कशी होणार साजरी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:38 IST

Amravati : महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या ३९ विभागांमध्ये कार्यरत १६ लाख कर्मचाऱ्यांना अद्यापही सप्टेंबर महिन्याचा पगार मिळालेला नाही. अर्थ विभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही, हे वास्तव आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगाराविना राहण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके सेवार्थ प्रणालीद्वारे अदा होत असताना ऐन दिवाळीच्या पुढे सेवार्थ प्रणाली अपडेट करण्याची गरज वित्त विभागाला का पडली?, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोषागार कार्यालयाचा नकार

राज्य शासनात ३९ शासकीय विभाग आणि २८ च्यावर महामंडळे कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कोषागार कार्यालयातून मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यामध्ये थेट जमा केले जाते. मात्र, पदांचा ताळमेळ न झाल्यामुळे कोषागार कार्यालयाने माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल संबंधित विभागांना परत केले नाही. १ तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय असताना ७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.

कर्मचाऱ्यांचा ताळमेळ नाही

  • कर्मचाऱ्यांच्या सेवा ऑनलाइन झाल्यामुळे राज्यात नेमके शासकीय कर्मचारी किती? या संख्येबाबत प्रशासन विभागात मेळ जुळत नाही.
  • जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत, असे कर्मचारी सेवा प्रणालीवर कार्यरत दिसतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीमधून बाहेर न काढल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.
  • आकृतिबंध याचासुद्धा ताळमेळ जुळत नाही. जोपर्यंत विभागाचे ३ प्रमुख अधिनस्थ कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन सेवार्थ प्रणालीवर ऑनलाइन करणार नाही, तोपर्यंत अशा विभागाचे वेतन होणार नसल्याचे समजते.

 

"राज्य शासनाच्या ऑगस्ट २०२५च्या एका आदेशानुसार शासन स्तरावर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदांचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे विभाग प्रमुखांनी पदांचा ताळमेळ जुळवून तसे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश दिले होते. मात्र, बहुतांश विभागाने सप्टेंबर पेड ऑगस्ट महिन्यात प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी, वेतन अदा करणे थांबले आहे."- अमोल ईखे, उपजिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Employees' Salary Crisis Looms Before Diwali Celebration

Web Summary : 1.6 million Maharashtra government employees face delayed September salaries due to Sevarth system updates. Discrepancies in employee data and departmental coordination have halted payments, casting a shadow over Diwali festivities. Treasury office cites mismatched data as the reason for the delay.
टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारीGovernmentसरकार