शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:26 IST

Amravati : जिल्हाभरात एकच केंद्र सुरू; खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : प्रत्येक तालुक्यात कापसाची खरेदी करण्यात येणार असल्याचे सीसीआयने जाहीर केले असले तरी जिल्ह्यात मात्र सात दिवसांपूर्वी सात केंद्रे सुरू झाली. १५ दिवसांपूर्वी फक्त एक केंद्र धामणगावला सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कापसाला हमीभाव तर दूर, खेडा खरेदीमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

कपाशी हे जिल्ह्याचे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे नुकसान झाल्याने कापसाचे सरासरी उत्पादन कमी येत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहेच, शिवाय सततच्या पावसाने कपाशीची बोंडसड झाली आहे. लाल्याने दोन वेच्यात उलंगवाडी होईल, अशी स्थिती आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत, निवडणुकीमुळे कामगारांचा तुटवडा आहे. वेचणीचा दर किलोमागे १० रुपयांवर गेला आहे. त्यातुलनेत कापसाला सात हजारांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भारतीय कापूस महामंडळाद्वारा ५ नोव्हेंबरला धामणगाव रेल्वे येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. येथे आतापर्यंत ५०० क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. अन्य तालुक्यात अद्याप केंद्र सुरू झालेली नाहीत. आठ दिवसांपूर्वी दर्यापूर, येवदा, दर्यापूर, भातकुली, वरूड, नांदगाव पेठ, अंजनगाव सुर्जी येथे सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले तर चांदूरबाजार प्रस्तावित असल्याची माहिती आहे. दरम्यान शासन खरेदीला विलंब व विधानसभा निवडणूक प्रचार यासर्व कारणांमूळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मिळेल त्या भावात कापूर विकत आहे.

१२ क्विंटलची मर्यादा, आर्द्रतेचा निकष 

  • सीसीआय केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना पहिली नोंदणी करावी लागते. यासाठी सातबारा, आधार कार्ड महत्त्वाचे आहे व आधारलिंक असलेल्या खात्यामध्येच पेमेंट जमा केले जाते. यावेळी खरेदीसाठी एकरी १२ क्चिटलची मर्यादा आहे.
  • कापसामध्ये किमान ८ ते १२ टक्के आर्द्रता व एफएक्यू दर्जा ही प्रमुख अट आहे. ८ टक्के आर्द्रता असेल, तर ७,५२१ रुपये क्विंटल हा हमीभाव मिळतो. मात्र, आर्द्रता एक टक्क्याने वाढल्यास क्विंटलमागे हमीदराच्या एक टक्का दर कमी होत जातो.

निवडणुकीमुळे वेचणीला मजूर मिळेनात शेतीच्या कामांसाठी पहिलेच मजुरांची कमतरता आहे. अशातच विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असल्याने कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याचे शिवारातील चित्र आहे. त्यातच कापूस वेचणीचे दर आताच १० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंब शेतात स्वतः राबताना दिसत आहेत. 

टॅग्स :AmravatiअमरावतीcottonकापूसFarmerशेतकरी