शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने २५ हजार २९४ गाठली, पाच दिवसांत १८१८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत ...

अमरावती : कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार २९४ संक्रमितांची नोंद झाली, तर मृतांची संख्या ४३५ झाली आहे. १० फेब्रुवारीपासून सातत्याने तीन शतकी रूग्णसंख्येने अमरावतीकरांमध्ये भीती व्यक्त होत आहे.

नवीन वर्षात जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या संख्येत बेफाम वाढ होत आहे. फेब्रुवारीत यात अधिक भर पडली आहे. विशेषत: कोरोनाने ज्येष्ठ नागरिकांचे बळी घेतल्याची आकडेवारी आहे. अमरावती शहरात संक्रमितांची संख्या वाढीस लागली असून, महापालिका प्रशासनाने गृह विलगीकरण रुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु, दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा हैराण झाली आहे.

------------

आतापर्यंत ४३५ मृत्यू

मार्चपासून तर आतापर्यंत ४३५ कोरोना संक्रमित रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. रविवारी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात अमरावती येथील कृष्णार्पण कॉलनीतील ६४ वर्षीय पुरुष, राजापेठ येथील नरहरीनगरातील ८४ वर्षीय पुरुष, तर प्रसादनगरातील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

---------------------

त्रिसूत्रीचे पालन विसरले

कोरोना लस येताच, नागरिक त्रिसूत्रीचे पालन करणे विसरले आहेत. केवळ ५ ते १० टक्केच नागरीक मास्कचा वापर करतात. शारीरिक अंतराचे पालन कुठेही दिसून येत नाही. बाजारपेठेतील गर्दी बघता, कोरोनाचा स्फोट होण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू झाली आहे. नियमित हात धुणे तर आता बंदच झाले आहे. कोरोना वाढीस बहुधा नागरिक जबाबदार असल्याचे एकंदर चित्र आहे.

----------

मृत्युदर १.८६ टक्के

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या २५ हजार २९४ संक्रमितांपैकी कोरोनाने ४३५ जणांचा बळी घेतला. हा मृत्युदर १.८६ टक्के असा आहे. मृतांमध्ये वयस्कर व्यक्ती व वृद्धांची संख्या अधिक आहे.

----------------

कॉलन्यांमध्ये संसर्गाची भीती

शहरातील कॉलनी, अपार्टमेंट यात कोरोना पॉझिटिव्ह जादा आढळून येत आहेत. त्याच्या तुलनेत मागास नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून येण्याची संख्या कमी आहे.

--------------

रविवारी यंदाचा उच्चांक

नवीन वर्षात १४ फेब्रुवारीपर्यंत रविवारी निष्पन्न झालेला कोरोनाग्रस्तांचा ३९९ हा आकडा सर्वाधिक आहे. १० ते १४ फेब्रुवारी या दरम्यान पाच दिवसांत १८१८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

-------------------

एकूण पॉझिटिव्ह- ३९९

दाखल रुग्ण - ५११

बरे होऊन घरी परतले- ३७४

महापालिका क्षेत्रात गृह विलगीकरण - २२५

ग्रामीण क्षेत्रात गृह विलगीकरण - ३६९

ॲक्टिव्ह रुग्ण - ११०५

रिकव्हरी रेट - ९३.९१

डबलिंग रेट- २६६.१

एकूण नमुने - १ लाख ९३ हजार ४६४