शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणूकीसाठी कॉंग्रेसची नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST

पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक : चार निरीक्षकांची नियुक्ती अमरावती : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, १६ डिसेंबर राेजी ...

पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक : चार निरीक्षकांची नियुक्ती

अमरावती : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, १६ डिसेंबर राेजी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर व यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील चारही नगरपंचायतींत काँग्रेसचीच सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. याकरिता चार निरीक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी कामाला लागण्याचे निर्देश यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले. या बैठकीला माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर यांच्यासह पक्षाचे निरिक्षक सुनिल कोल्हे व धनंजय देशमुख यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली नगर पंचायतीचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका संपताच नगरपंचायतीच्या निवडणुका लागण्याचे संकेत आहे. निवडणुकीची पुर्वतयारी व नियोजन करण्याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीने ही बैठक बोलविली होती. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी पदाधिकाऱ्यांना मागदर्शन करून चारही नगरपंचायतींवर काँग्रेसचाच झेंडा फडकविण्याबाबचे निर्देश दिले, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सत्ता प्राप्त करण्यातकरिता केलेल्या नियोजनाचे सादरीकरण करीत चारही नगरपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी जिल्हा काँग्रेस सज्ज असल्याचे सांगितले. शिवाय स्थानिक पदाधिकाऱ्यांनादेखील नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, मुकद्दर पठाण, अतुल देशमुख, मुकुंद देशमुख, अमोल धवसे, तसेच संजय लायदे, निशिकांत जाधव, परिक्षित जगताप, पंकज मोरे, सिद्धार्थ बोबडे उपस्थित होते.

बॉक्स

असे आहेत निरीक्षक

काँग्रेस पक्षाने नगरपंचायतीकरिता निरीक्षक नियुक्त केले आहेत. यात धारणी व नांदगाव खंडेश्र्वर नगरपंचायतीसाठी सुनील कोल्हे, धनंजय देशमुख यांच्याकडे तिवसा व भातकुली या दोन नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पदाधिकाऱ्यांना एका नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी तिवसा येथे २७ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. नांदगाव खंडेश्र्वर येथे गिरीश कराळे यांच्या उपस्थितीत बैठक २८ डिसेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता होईल. बाळासाहेब हिंगणीकर यांच्या उपस्थितीत २ जानेवारी दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. तर भातकुली तालुक्याची जबाबदारी गणेश आरेकर यांच्याकडे देण्यात आली असून ते ४ जानेवारी दुपारी २ वाजता बैठक घेणार आहे.