शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण

By गणेश वासनिक | Updated: September 23, 2022 19:20 IST

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसने सामूहिक हनुमान चालिसा पठण करून आंदोलन केले. 

अमरावती : मागील दोन वर्षांपासून बंद असलेली अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दोन्ही खासदारांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी शुक्रवारी काँग्रेसच्यावतीने मॉडेल रेल्वे स्थानकावर सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले.  माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात हे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.

गेल्या ८ वर्षांत केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारद्वारे जिल्ह्यात कोणतीही नव्या रेल्वेची सुरुवात केली नाही, असा आरोप काँग्रेसने केला. जबलपूर रेल्वे गाडी बंद होईपर्यंत दोन्ही खासदारांना, मोदी सरकार आणि रेल्वे मंत्र्यांना जाग आली नाही. नागरिकांच्या विकासात्मक प्रश्नांवर अग्रक्रमाने भूमिका घेण्यासाठी सद्बुद्धी येवो, याकरिता हनुमान चरणी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करून साकडे घातले. जबलपूर रेल्वे सुरू न केल्यास काँग्रेस पक्षातर्फे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर उपस्थित होते. 

विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, भैय्या पवार, किशोर बोरकर, अनिल तरडेजा यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्री यांना स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे यांच्यामार्फत जबलपूर रेल्वे सुरू केल्याप्रकरणी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजय वाघ, विनोद मोदी, कोमल बोथरा, मुन्ना राठोड, अशोक डोंगरे, शोभा शिंदे, फिरोज खान, भालचंद्र घोंगडे, राजू भेले, विजय वानखडे, डॉ. मातीन अहेमद, अभिनंदन पेंढारी, सुनील पडोळे, मनोज मिश्रा, विकास तिवारी, अतुल कालबेंडे, अनिल देशमुख, योगेश बुंदेले, भैय्यासाहेब निचळ, धीरज हिवसे, अमर भेरडे, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, कीर्तीमाला चौधरी, अविनाश सोलंकी, सचिन निकम, जनार्धन वानखडे आदी उपस्थित होते.

'त्या' बैठकीला दोन्ही खासदार गैरहजरजबलपूर एक्स्प्रेस का रद्द करण्यात आली? याबाबत माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी रेल्वेच्या वरिष्ठांशी विचारणा केली असता, जून महिन्यात या गाडीविषयी बैठक घेण्यात आली होती. तेव्हा अमरावती जिल्ह्याचे दोन्ही खासदार या बैठकीला गैरहजर होते. अमरावती-जबलपूर गाडी ही व्यावसायिकदृष्ट्या नफ्यात चालणारी असल्याचे सर्वश्रुत आहे. तरीही नव्या गाडीसाठी प्रयत्न करण्याऐवजी आहे ती गाडीसुद्धा बंद करण्याचे पातक केंद्रातील मोदी सरकारने व अमरावती जिल्याच्या दोन्ही खासदारांनी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीBJPभाजपाcongressकाँग्रेसagitationआंदोलन