शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण

By गणेश वासनिक | Updated: September 23, 2022 19:20 IST

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसने सामूहिक हनुमान चालिसा पठण करून आंदोलन केले. 

अमरावती : मागील दोन वर्षांपासून बंद असलेली अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दोन्ही खासदारांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी शुक्रवारी काँग्रेसच्यावतीने मॉडेल रेल्वे स्थानकावर सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले.  माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात हे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.

गेल्या ८ वर्षांत केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारद्वारे जिल्ह्यात कोणतीही नव्या रेल्वेची सुरुवात केली नाही, असा आरोप काँग्रेसने केला. जबलपूर रेल्वे गाडी बंद होईपर्यंत दोन्ही खासदारांना, मोदी सरकार आणि रेल्वे मंत्र्यांना जाग आली नाही. नागरिकांच्या विकासात्मक प्रश्नांवर अग्रक्रमाने भूमिका घेण्यासाठी सद्बुद्धी येवो, याकरिता हनुमान चरणी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करून साकडे घातले. जबलपूर रेल्वे सुरू न केल्यास काँग्रेस पक्षातर्फे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर उपस्थित होते. 

विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, भैय्या पवार, किशोर बोरकर, अनिल तरडेजा यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्री यांना स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे यांच्यामार्फत जबलपूर रेल्वे सुरू केल्याप्रकरणी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजय वाघ, विनोद मोदी, कोमल बोथरा, मुन्ना राठोड, अशोक डोंगरे, शोभा शिंदे, फिरोज खान, भालचंद्र घोंगडे, राजू भेले, विजय वानखडे, डॉ. मातीन अहेमद, अभिनंदन पेंढारी, सुनील पडोळे, मनोज मिश्रा, विकास तिवारी, अतुल कालबेंडे, अनिल देशमुख, योगेश बुंदेले, भैय्यासाहेब निचळ, धीरज हिवसे, अमर भेरडे, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, कीर्तीमाला चौधरी, अविनाश सोलंकी, सचिन निकम, जनार्धन वानखडे आदी उपस्थित होते.

'त्या' बैठकीला दोन्ही खासदार गैरहजरजबलपूर एक्स्प्रेस का रद्द करण्यात आली? याबाबत माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी रेल्वेच्या वरिष्ठांशी विचारणा केली असता, जून महिन्यात या गाडीविषयी बैठक घेण्यात आली होती. तेव्हा अमरावती जिल्ह्याचे दोन्ही खासदार या बैठकीला गैरहजर होते. अमरावती-जबलपूर गाडी ही व्यावसायिकदृष्ट्या नफ्यात चालणारी असल्याचे सर्वश्रुत आहे. तरीही नव्या गाडीसाठी प्रयत्न करण्याऐवजी आहे ती गाडीसुद्धा बंद करण्याचे पातक केंद्रातील मोदी सरकारने व अमरावती जिल्याच्या दोन्ही खासदारांनी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीBJPभाजपाcongressकाँग्रेसagitationआंदोलन