शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

कोरडा दुष्काळ, वाढीव घर टॅक्स, नोटीस जाळल्या; आंदोलनांनी गाजला मंगळवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 12:15 IST

मालमत्ता वाढीव कर, काँग्रेसचा हल्लाबोल : 'प्रहार'चा मोर्चा : शेतकऱ्यांचा आक्रोश

अमरावती : महापालिकेतील भ्रष्टाचार, लादलेली भरमसाट मालमत्ता करवाढ, साफसफाईत हलगर्जी आणि वाढलेला डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप, रस्त्यांवरील खड्डे आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढला. आयुक्त देवीदास पवार यांना निवेदन सादर करून भाजपच्या वाढीव मालमत्ता स्थगितीचे काय झाले, याविषयी जाब विचारला.

वाढीव घर टॅक्सबाबत नागरिकांना बजावण्यात येणाऱ्या नोटिशीवरही काँग्रेसने संताप व्यक्त केला. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव मालमत्ता कराला स्थगिती दिली होती. ते फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी होते काय? या महागाईच्या काळात हा टॅक्स सर्वसामान्य नागरिकांसोबत काँग्रेस पक्षालादेखील मान्य नाही, अशी भूमिका शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी घेतली.

जनतेच्या शिरावर नवनवीन टॅक्सचे ओझे, मालमत्ता करात अवाढव्य वाढ, प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार, साफसफाईअभावी अस्वच्छतेच्या ढिगारावर महानगर असून डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचा विळखा शहराला बसलेला आहे. रस्त्यांवर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य उभारले गेले आहे. महापालिकेत कमिशनराज बोकाळले आहे. वाढीव मालमत्ता कर रद्द करावा, शहरात मोकाट जनावरे आणि मोकाट श्वानांच्या हैदोसावर अंकुश लावावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आत्मक्लेश ते मंत्रालयात हल्लाबोल आंदोलन @ १०३

काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, अॅड. दिलीप एडतकर, किशोर बोरकर, भैया पवार, आसिफ तव्वकल, सुनीता भेले, वंदना कंगाले, अशोक डोंगरे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रहारने केली नोटीसची होळी

अमरावती महापालिका हद्दीत मालमत्ता करवाढीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मंगळवारी आंदोलन केले. महापालिकेवर धडक मोर्चा काढत करवाढीच्या नोटीसची होळी केली. मनपा आयुक्तांना एक महिन्याचा अल्टिमेटम निवेदनातून दिला. 

प्रहारने आंदोलनातून महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली. यावेळी बडनेरातील गौतम बुद्ध वार्ड (फुकटनगर) अधिकृत झोपडपट्टी घोषित करावे, बडनेरा शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ, नवी वस्ती येथील बस स्थानक ते दुर्गापूर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती आदी मागणीही यावेळी करण्यात आली. 

यावेळी संपर्कप्रमुख गोलू पाटील, उमेश मेश्राम, श्याम इंगळे, सुधीर मानके, विक्रम जाधव, नंदू वानखडे, मनीष पवार, अंकुश पंचवटे, कुणाल खंडारे, मुकेश गोसावी, बंडू मेश्राम, पीयूष गेडाम, विजय मेश्राम, सिद्धांत बोरकर, गौरव मेश्राम, साहिल शेंडे, स्वप्निल मेश्राम, अमन राऊत आदी उपस्थित होते.

जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा. पाणंद रस्ते दुरुस्त करा. २४ तास वीजपुरवठा आदी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा काढला. 

संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख नितीन कदम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हा कचेरीवर बैलबंडी, ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी सायन्स कोअर मैदानातून आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मार्चेकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

दरम्यान, यावेळी नितीन कदम यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मोर्चात करुणा कदम, अक्षय धुळस, हर्षा कावरे, हर्षल कावरे, प्रवीण मोहोड, राजेश वानखडे, अमित अढाऊ, परवेज कदम, निशा कदम, स्मृती धुळस, वैष्णवी कदम, सोनाली कदम, चंदा बोडखे, प्रफुल्ल तऱ्हाडे, शुभम उभाड, बाबूजी तऱ्हाळ, किरण गुडधे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाला आझाद पार्टी, भीम ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा देऊन मोर्चात सहभाग घेतला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही कदम यांनी शासन व प्रशासनाला दिला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीcongressकाँग्रेसAmravatiअमरावतीGovernmentसरकार