शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 5:26 PM

एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे.

- मोहन राऊत

अमरावती - एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे.अभियांत्रिकी क्षेत्राकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी व सदर महाविद्यालये डबघाईस आले आहेत. या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाºया इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांना शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती शासनाने प्रथम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.याविरुद्ध मुंबई व पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. सदर शिष्यवृत्ती महाविद्यालय किवा संबंधित शिक्षण संस्थांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व भारती डांगरे यांनी दिला होता. एक महिन्याच्या आत संबंधित महाविद्यालयांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले होते. मात्र, अध्यापही राज्यातील या महाविद्यालयांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. वर्ष संपले असून शासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने शासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. तसेच ईबीसीचा लाभ घेणाºया विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. त्यांचे शुल्क हे शासन भरते. हे शुल्क व शिष्यवृत्ती महाविद्यालयांना वर्षाच्या अखेरीस मिळत नाही. प्राध्यापकांना आठ ते दहा महिने वेतनही देणे कठीण झाल्यामुळे महाविद्यालय चालवावे कसे, प्रश्न पडतो.  - एल.पी. धामंदे, प्राचार्य, धामणगाव अभियांत्रिकी महाविद्यालय

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालय