शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नुकसान भरपाईची आकडे‘फेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:01 IST

यंदाच्या खरिपात दीड लाख हेक्टरवरील कपाशी गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झाली. या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शासनाने कापूस उत्पादकांना हेक्टरी ३० हजार ८०० रूपयांची मदत जाहीर केली.

ठळक मुद्देतोंडाला पुसली पाने : बोंडअळीचे नुकसान, कापूस उत्पादकांची परवड

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात दीड लाख हेक्टरवरील कपाशी गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झाली. या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शासनाने कापूस उत्पादकांना हेक्टरी ३० हजार ८०० रूपयांची मदत जाहीर केली. या घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात लाभ मिळणे एकंदरीत कठीण असल्यामुळे पुन्हा एकदा शासनाने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होत आहे.या दशकात कृषी क्षेत्रावर ओढावलेला सर्वात मोठे संकट, असा उल्लेख यंदा कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी केला जातो. विदर्भात दहा लाख, अमरावती विभागात सहा लाख, तर अमरावती जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर यंदा हे संकट ओढावले आहे. बीटी तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच शेतकºयांवर आरिष्ट्य कोसळले आहे. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकात नांगर फिरविल्या जात आहे. शेतकरी आक्रमक झाल्यानेच शासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन आठवड्याच्या आत अहवाल मागितला. प्रत्यक्षात मुदतपूर्व केवळ ५० टक्के क्षेत्राचेच पंचनामे कृषी विभाग करू शकला. शुक्रवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बोंडअळीने बाधित क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत जिरायती कपाशीला हेक्टरी ३० हजार ८०० तर बागायती कपाशीला ३७ हजार ५०० रूपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांमध्ये या मदतीच्या आकड्यांविषयी संभ्रम आहे. जाहीर केल्याप्रमाणे एकाही शेतकऱ्यांला मदत मिळणार नसल्यामुळे शासनाने पुन्हा आकड्यांची फेकाफेक करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होत आहे.‘एनडीआरएफ’ची ग्वाही,‘एसडीआरएफ’चे काय?केंद्राने एप्रिल २०१५ मध्ये ‘एनडीआरएफ’च्या निकषामध्ये बदल केले ते राज्यालाही बंधनकारक आहे. या निकषानुसार कीड व रोगामुळे शेतीपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास हेक्टरी ६ हजार ८०० रूपये मदत केंद्रीय आपदा निवारण कोषामधून दिली जाते. या मदतीसाठी शासन कमालीचे आग्रही आहे. यासोबतच राज्याच्या ‘एसडीआरएफ’मधून मदत देऊन शेतकºयांना दिलासा का देत नाही, असा शेतकºयांचा सवाल आहे.विम्याची भरपाई, हा तद्दन खोटा दावाबोंडअळीच्या बाधित क्षेत्राला पीक विम्याची हेक्टरी ८ हजारांची नुकसान भरपाई देण्यात येईल, असे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी पीकविमा उंबरठा उत्पन्नावर जाहीर होतो. त्यासाठी आता तालुका हा घटक गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणीच मिळणारी भरपाईसारखी कसी राहील, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला. केवळ आकड्यांची फेकाफेक करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.कंपन्या भरपाई देतील याची शास्वती काय?बीटी बियाणे तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच यंदा बोंडअळीचे संकट ओढावले. या विषयी हजारो तक्रारी झाल्यात काही तक्रारी पोलीस ठाण्यातही झाल्यात. पाच कंपणीचे बियाणे सदोष असल्याचे सीबीआयची चौकशीची मागणी राज्याचे मुख्यमंत्र्यानीच केंद्राकडे केलीे. या बियाणे कंपण्या कापूस नियंत्रन कायद्यातंर्गत हेक्टरी १६ हजारांची भरपाई देणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या घोषनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमच आहे.

टॅग्स :cottonकापूस