शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Amravati | चुनखडीचे उपकेंद्र कुलूपबंद; उपचाराअभावी अतिसाराने रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 15:03 IST

प्रशासनाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येणाऱ्या चुनखडी आरोग्य केन्द्राला टाळे लागले असल्यामुळे उपचाराअभावी एका अतिसारग्रस्त आदिवासीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली, त्यामुळे आरोग्य यंत्रणा किती सतर्क आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा परिसरात आला आहे. १५ दिवसांपूर्वी कोयलारी पाचडोंगरी येथे चौघांचा मृत्यू झाल्यावरही यंत्रणा मृत अवस्थेतच असल्याचे पुढे आले आहे.

शुधम बुडा कास्देकर (वय ४५, रा चुनखडी) असे मृताचे नाव आहे. पोटदुखी, हगवण, उलटी असा त्रास झाल्याने त्याला सोमवारी रात्री चुनखडी येथीलच आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. दवाखान्याला कुलूप होते. एकही कर्मचारी उपस्थित नव्हता, इतकेच नव्हे, तर तेथे मुख्यालयी असणार, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी नुकतीच दिलेली ॲम्ब्युलन्ससुध्दा हजर नव्हती. परिणामी रुग्णाला प्रचंड यातना सहन करत जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मेळघाटात आदिवासींची निव्वळ थट्टा सुरू असल्याचे वास्तव या घटनेने पुन्हा अधोरेखित केले असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

खडीमलवरून आणली ॲम्ब्युलन्स

चुनखडी उपकेंद्राला कुलूप असल्याने सुधम कासदेकर याला वाचविण्यासाठी त्याचा भाऊ पप्पू दुचाकीने मध्यरात्री १ वाजता खडीमल गावात गेला व तेथून रुग्णवाहिका आणली; परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. आपल्या मोठ्या भावाचा मृत्यू आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी पप्पू बुडा कासदेकर, नंदराम बाबजी भुसुम, शालीकराम कालू कासदेकर यांनी केली आहे.

आरोग्य यंत्रणा नॉट रिचेबल

या संपूर्ण घटनाक्रमानंतर काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू चुनखडी गावात गेल्याची माहिती आहे. यासंदर्भात संबंधित आरोग्य यंत्रणाच्या डॉक्टरांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

मृतकाची पत्नी चुरणीत भरती

दरम्यान, दूषित पाण्याच्या शिरकावाने मेळघाटात मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण प्रत्येक गावात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवर जिल्हाधिकारी पवनीत कौर, सूचना दिल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी पाठ फिरवताच स्थिती पुन्हा ‘जैसे थे’च झाली आहे. मृतकाची पत्नीसुद्धा अतिसाराने गंभीर आजारी असून तिच्यावर चुरणी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

गंभीर आजारी भावाला गावातील दवाखान्यात नेले. मात्र, कुलूप बंद होते. तेथे रुग्णवाहिकाही नव्हती. दुचाकीने जाऊन खडीमल या गावातून रुग्णवाहिका आणली; परंतु भरपूर वेळ झाला होता. त्यात माझ्या भावाचा मृत्यू झाला. संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

पप्पू कासदेकर, चुनखडी, मृतकाचा भाऊ.

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटAmravatiअमरावती