शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शाळांमध्ये राबविली जाणार ‘बाल स्वच्छता मोहीम’

By admin | Updated: November 15, 2014 01:08 IST

स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अगदी गावपासून ते राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.

गजानन मोहोड अमरावतीस्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अगदी गावपासून ते राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. ‘स्वच्छ भारत हे मिशन साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. यासाठी १४ नोव्हेंबर या बालदिनापासून ‘बाल स्वच्छता मोहीम’ सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान सुरु राहील. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली आहे. याच मोहिमेसोबत प्रत्येक शाळेमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र वापरण्यायोग्य स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याबाबत शासकीय यंत्रणेस निर्देश दिले आहे. तसेच इतर घटकांना या कामी योगदान देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.शाळा या शिक्षणाचे केंद्रबिंदू आहेत. पालक, समाज यांना बालकांच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य व निटनेटकेपना याबाबतचा संदेश पोहचवता येईल, अशी आशा शिक्षण विभागाला आहे. याकामी बालकांच्या माध्यमातून त्यांच्या घरांमध्ये भावंडे, त्यांचे सवंगडी यांच्यामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होऊ शकते यासाठी विद्यार्थ्यांचे विविध गट, यामध्येही शाळा आरोग्य गट यांच्यामार्फत आरोग्य व स्वच्छतेविषयक विविध उप्रमांची अंमलबजावणी त्या अनुशंगाने बालकांना वैयक्तिक स्वच्छता, त्यांचे घर, शाळा व सभोवतालचा परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवण्याचे पटवून देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये मलामूलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हात धूण्याची जाग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, नियमित स्वच्छता व आरोग्यविषयक निगा व देखभाल याबाबी असणे आवश्यक आहे.स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता व त्याद्वारे शाळांमध्ये आरोग्यदायी व प्रफुल्ल वातावरण तयार होऊ शकेल त्यामुळे बालक व त्यांचे कुटुंब यांच्या मध्येही आरोग्यविषयक चांगल्या सवयी रुजन्यास मदत होईल. आजाराचे प्रमाण कमी होऊन बालकांच्या उपस्थितीमध्ये वाढ होईल त्याची संपादणूक पातळी वाढेल आणि खऱ्या अर्थाने बालकांचे शैक्षणिक समानतेचे समावेश होईल आणि याचा राष्ट्र विकासामध्ये व आर्थिक वृध्दी होण्यासाठी हातभार लागणार आहे.