शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत

By उज्वल भालेकर | Published: July 08, 2023 6:03 PM

मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले

अमरावती : राजकारणात राजकीय स्वचरित्र असावे लागते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकारण हे चारित्र्यहीन झाले आहे. विचारांशी बांधिलकी राहिलेली नाही. सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत असून, खरेदीदारदेखील उभे आहेत. परंतु सत्य हे कधीही लपत नाही. अशा राजकीय वातावरणातही उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे असल्याचे मत खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

उद्धव ठाकरे हे ९ आणि १० जुलै असे दोनदिवसीय विदर्भ दौरा करीत आहेत. या दौऱ्यामध्ये ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अमरावतीमध्येही १० जुलैला संवाद सभा होणार आहे. त्याअनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी अमरावतीमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सभा स्थळाची पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना सूचना दिल्या.

तसेच यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार सावंत म्हणाले, काळ इतका बदलला की माणसांनी माणुसकी विसरली आहे. ज्याने घडविले त्या शिल्पकारालाच विसरले, त्या शिल्पकारालाच घेऊन पळायला लागली आहेत. सध्याच्या राजकारणातून माणुसकी हरवली असून, सत्व आणि तत्त्व उरलेले नाही. कालपर्यंत आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आत तेच त्या हिंदुत्वाच काय झालं हे विचार करताहेत. ज्यांच्यामुळे ते उद्धव साहेबांना सोडून गेले, आज तेच त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यामुळे मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षArvind Sawantअरविंद सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे