शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत

By उज्वल भालेकर | Updated: July 8, 2023 18:08 IST

मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले

अमरावती : राजकारणात राजकीय स्वचरित्र असावे लागते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकारण हे चारित्र्यहीन झाले आहे. विचारांशी बांधिलकी राहिलेली नाही. सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत असून, खरेदीदारदेखील उभे आहेत. परंतु सत्य हे कधीही लपत नाही. अशा राजकीय वातावरणातही उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे असल्याचे मत खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

उद्धव ठाकरे हे ९ आणि १० जुलै असे दोनदिवसीय विदर्भ दौरा करीत आहेत. या दौऱ्यामध्ये ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अमरावतीमध्येही १० जुलैला संवाद सभा होणार आहे. त्याअनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी अमरावतीमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सभा स्थळाची पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना सूचना दिल्या.

तसेच यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार सावंत म्हणाले, काळ इतका बदलला की माणसांनी माणुसकी विसरली आहे. ज्याने घडविले त्या शिल्पकारालाच विसरले, त्या शिल्पकारालाच घेऊन पळायला लागली आहेत. सध्याच्या राजकारणातून माणुसकी हरवली असून, सत्व आणि तत्त्व उरलेले नाही. कालपर्यंत आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आत तेच त्या हिंदुत्वाच काय झालं हे विचार करताहेत. ज्यांच्यामुळे ते उद्धव साहेबांना सोडून गेले, आज तेच त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यामुळे मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षArvind Sawantअरविंद सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे