वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST2021-08-26T04:16:39+5:302021-08-26T04:16:39+5:30
अमरावती/ संदीप मानकर वीज मीटरमध्ये फेरफार आढळल्यास दंडस्वरूपात मोठी किंमत मोजावी लागते. मीटर जप्तीचीसुद्धा कारवाई किंवा वीज वापरानुसार हजार ...

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार!
अमरावती/ संदीप मानकर
वीज मीटरमध्ये फेरफार आढळल्यास दंडस्वरूपात मोठी किंमत मोजावी लागते. मीटर जप्तीचीसुद्धा कारवाई किंवा वीज वापरानुसार हजार रुपयापासून लाखो रुपयांचा दंडसुद्धा वीज ग्राहकांना होऊ शकतो. तसेच वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधारसुद्धा होऊ शकतो. गत पाच महिन्यात महावितरणच्या पथकाने वीज ग्राहकांवर धाडी टाकून २२१ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्याकरिता महावितरणतर्फे वेळोवेळी धडक मोहीमसुद्धा राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
२०१९-१०७३
२०२०-५६२
२०२१-२२१
बॉक्स:
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी
वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्यास घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांवर धाडी टाकून महावितरणचे अधिकारी किंवा भरारी पथक कधीही धाड टाकून वीज ग्राहकांची तपाणी करू शकतात. ज्या कामासाठी वीज घेतली आहे, त्याचा वापर आढळून न आल्यास किंवा वीज चोरी पकडल्यास दंडात्मक कारवाई किंवा तडजोड शुल्क न भरल्यास एफआयआरसुद्धा करण्यात येतो.
बॉक्स:
मीटर जप्त अन लाखो रुपयांचा दंड
१) मीटरमध्ये फेरफार केल्यास मीटर जप्त किंवा विजेचा वापर किती केला त्यानुसार एक हजारापासून तर लाखो रुपयांचा दंड आकारल्या जाऊ शकतो.
२) विद्युत कायदा २००३ अंतर्गत कलम १३५ नुसार कारवाई केली जाते. ग्राहकांना तडजोड शुल्क भरण्याची संधी दिली जाते. जर तडजोड शुल्क भरला नाही तर एफआयआरसुद्धा केला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट