शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तूर उत्पादकच आरोपीच्या पिंजऱ्यात

By admin | Updated: April 30, 2017 00:01 IST

अडीच लाख क्विंटल तूर केंद्रावर व त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या घरी पडून असताना केंद्र बंद करण्यात आलीत.

हेच का अच्छे दिन ? : यार्डातील तूर खरेदीच्या शासनादेशात जाचक अटीअमरावती : अडीच लाख क्विंटल तूर केंद्रावर व त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या घरी पडून असताना केंद्र बंद करण्यात आलीत. यार्डात पडून असलेली तूर खरेदी करण्याच्या आदेशाला पाच दिवस लागलेत. या आदेशातही अनेक जाचक अटी आहेत, तूर उत्पादकाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याने हेच का ‘अच्छे दिन’, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांचा आहे.जिल्ह्यातील दहा तूर खरेदी केंद्र २२ एप्रिल रोजी बंद केलेत. येथे अडीच लाख क्विंटल तूर पडून आहे. ही तूर खरेदी करण्याचे आदेश सरकारने २७ एप्रिल रोजी सायंकाळी दिलेत या आदेशातही जाचक अटी असल्याने तुरीचे बंपर उत्पादन शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. मुळात नाफेडची केंद्र अर्धेअधिक दिवस बारदाना नाही, गोदाम नाही आदी क्षुल्लक कारणामुळे बंद राहिली आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच झुकते माप दिल्या गेल्याचा आरोप आहे. चाळण्या कमी, मोजणीचा वेग मंद यामुळे शेतकऱ्यांना दोन-दोन आठवडे तूर मोजणीसाठी तिष्ठत राहावे लागते व चुकाऱ्यांना महिन्याचा अवधी लागत आहे. आता यार्डात शिल्लक असलेली तुरीची खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी पणन महासंघ व विदर्भ सहकारी पणन महासंघ या संस्थांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र जोवर समितीमार्फत शेतमालाची पडताळणी होत नाही व शेतकरी स्वत:चा माल असल्याचे व आजवर कोठे व किती शेतमाल विकल्याचे ‘सेल्फ डिक्लेरेशन’ देत नाही तोवर या यंत्रणांना देखील तूर खरेदी करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे या जाचक अटीत तूर खरेदी अटकली आहे. (प्रतिनिधी)-हा तर शेतकऱ्यांवर अविश्वास !यार्डावरील तूर मोजणीच्या पूर्व शेतकऱ्यांना सात-बारा, उतारा द्यावा लागणार आहे. यंत्रणा पीक पेऱ्याप्रमाणे नोंद आहे काय याची खात्री करून कृषी विभागाने निश्चित केलेल्या हेक्टरी उत्पादनानुसार शेतकऱ्याजवळून तूर खरेदी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांकडून यापूर्वी शासनास कुठे-कुठे आणि किती क्विंटल तुरीची विक्री केली याबाबतचे सेल्फ डिक्लेरेशन घेण्यात येणार आहे व शेतकऱ्याच्या शेतातीलच उत्पादन याची खात्री झाल्यानंतरच तूर खरेदी करण्यात येणार असल्याने, हा तर शेतकऱ्यावरच अविश्वास असल्याचा आरोप होत आहे. ंजिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच तुरीची खरेदीयार्डावरील तुरीचा पंचनामा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील सहायक निबंधक, सहकारी संस्था, बाजार समितीचे सचिव, व्यवस्थापक, सबएजंट व खरेदीदार यंत्रणांचे प्रतिनिधी असणारी समिती करणार व २२ एप्रिलला आलेल्या तुरीची नोंदवही पडताळणीनंतर अंतिम करून जिल्हा उपनिबंधकामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द होणार आहे व त्यांनी मान्यता दिल्यानंतरच तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया क्लिस्ट असल्याने तूर मोजणीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे अनेक दिवस जाणार आहे. शेतकऱ्यांचा माल उघड्यावर, व्यापाऱ्यांचा शेडमध्येबाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हजारो शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडला आहे. त्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना कमी तर व्यापाऱ्यांना अधिक चाळण्या दिल्या जातात. शेतकऱ्यांसाठी बारदाना नाही. मात्र व्यापाऱ्यांना त्वरीत उपलब्ध होतो. यासह अनेक आरोप या केंद्रांवर होत आहेत.