शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीची मातीमोल भावात खरेदी

By admin | Updated: October 18, 2015 00:33 IST

मळणी झालेले ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, राज्य शासनाने अद्यापही हमीभावाचे परिपत्रक न काढल्याने ...

शेतकऱ्यांची लूट : हमीभावापेक्षा ४०० रूपये कमी दर नरेंद्र जावरे परतवाडामळणी झालेले ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, राज्य शासनाने अद्यापही हमीभावाचे परिपत्रक न काढल्याने व्यापारी प्रतिक्विंटल चारशे रूपये कमी दराने ज्वारीची खरेदी करीत आहेत. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ज्वारीचा हमीभाव १५७० रूपये प्रतिक्विंटल ठरला. मात्र. व्यापारी ११५० रूपयांप्रमाणेच ज्वारीची खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय दर जाहीर करण्याची मागणी अचलपूर बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ज्वारीच्या उत्पादनावर त्यांना थोड्याफार अपेक्षा होत्या. मात्र, शासनाच्या निर्धारित दरांपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी ज्वारीची खरेदी सुरू केली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्चही न निघाल्याने कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे ज्वारी विकून दिवाळी व दसरा साजरा करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत आहे. ४०० रूपये कमी दराने खरेदी जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीननंतर लेगच ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे. परंतु घरी न आणता ज्वारीचे पीक परस्परच बाजारात विक्रीसाठी नेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. शासनाचे नवीन परिपत्रक येईपर्यंत जुन्याच हमीभावाने खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र, व्यापाऱ्यांद्वारे ठरविण्यात आलेला दर शेतकऱ्यांची लूट करणारा ठरला आहे. जिल्ह्यातील पहिली मागणी अचलपुरातून ज्वारीला हमीभाव देण्याची पहिली मागणी जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांपैकी अचलपूर बाजार समितीकडून नोंदविण्यात आली आहे. बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी पणन् व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना एक निवेदन दिले आहे. जिल्हा पणन् व्यवस्थापकांनासुध्दा तसे पत्र देऊन ज्वारीचा हमीभाव तत्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. साडेतीन हजार क्विंटलची आवकअचलपूर बाजार समितीमध्ये १ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत जवळपास ३५०० क्विंटल ज्वारी खरेदी केल्याची नोंद आहे. त्याचा दर सरासरी ११५० रूपये इतका होता. हा दर शासकीय दरापेक्षा ४०० रूपयांनी कमी असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांचे अंदाजे १५ लक्ष रूपयांचे नुकसान झाले आहे. बाजार समितीमध्ये मागील महिनाभरात सोयाबीन १ लाख ११ हजार क्विंटल खरेदी केली गेली. त्याचा सरासरी दर ३४७५ रूपये इतका होता. गहू ११ हजार क्विंटल १५८० रूपये, हरभरा १४०० क्विंटल ४२५० रूपयांप्रमाणे खरेदी करण्यात आली. सातबारावर नोंदी शेतकऱ्यांची ज्वारी व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. हीच ज्वारी शासकीय खरेदी करताना जादा दराने याच शेतकऱ्यांच्या नावाने दाखविली जाते. ही प्रथा येथे सुरू आहे. चालू वर्षाच्या सातबारावर ज्वारी पिकाची नोंद घेऊन त्याला लाभ मिळविता येईल. आॅनलाईन किंवा हस्तलिखित सातबारा देण्याची मागणी राहुल कडू यांनी केली आहे.