शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

अमरावती: जिल्ह्यातील ग्रामीण भागात रबी हंगामाच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. मागील काही दिवसांपासून रबी हंगामासाठी शेती तयार ...

अमरावती: जिल्ह्यातील ग्रामीण भागात रबी हंगामाच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. मागील काही दिवसांपासून रबी हंगामासाठी शेती तयार करण्याच्या कामाला वेग आला होता. शेती तयार होताच काही भागांत गहू व हरभरा पिकांची पेरणीसुद्धा करण्यात आली आहे.

................................................................

रिक्त पदांचा अनुशेष कायमच

अमरावती : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या विभागातील खातेप्रमुखांचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. यात प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी या पदांचा समावेश आहे. रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.

...............................................................

रोजगार भरती मेळावा बुधवारी

अमरावती : स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक सूचना केंद्रात ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील २०१५ ते २०१९ मधील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अंशकालीन प्राचार्य एम.डी. देशमुख यांनी केले आहे.

.............................................

बाजारात संत्र्याची आवक

अमरावती : शहरातील पंचवटी ते कठोरा नाका तसेच अन्य मार्गावर संत्री फळविक्रीची अनेक दूकाने फुटपाथवर लागली आहेत. यंदा भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी संत्री स्वत: ताेडून बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. ग्राहकही आवडीने संत्री खरेदी करताना दिसून येत आहेत.

..............................................................

कृषिपंपांना अखंडित वीज द्या

अमरावती : सध्या खरिपापाठोपाठ ग्रामीण भागात रबी हंगामाची धामधूम सुरू आहे. शेतीला पाणी देण्यासाठी वीजपुरवठा नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ओलिताची कामे करावी लागतात. शेती कूषिपंपाला २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

...........................................................................

खैरी ते येलकी रस्ता दुरुस्तीची मागणी

अचलपूर : तालुक्यातील खैरी ते येलकी गावाकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. अंजनगाव सुर्जी तसेच परिसरातील गावात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा रहदारीचा हा मुख्य मार्ग़ आहे. परंतु, रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.

.............................................................................

ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे

अमरावती : शिक्षक मतदारसंंघाच्या निवडणुकीनंतर आता गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी या निवडणुकीची तयारी गावपातळीवरील राजकीय गटांमध्ये जोरात सुरू झाली आहे.

.....................................................

ग्रामीण भागात लालपरीची प्रतीक्षा

अमरावती : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत एसटी बस बंद होत्या. आता आंतरजिल्हा तसेच परजिल्ह्यातही बस सुरू करण्यात आल्या. मात्र, ग्रामीण भागात एसटी बसची प्रतीक्षा आहे.

..........................................

पाणीटंचाई आराखड्याची तयारी

अमरावती : उन्हाळ्याच्या दिवसांत भेडसावणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. याकरिता नियोजन केले जात आहे.