शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात बैलजोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली गेली नाही.

ठळक मुद्देकृती समितीचे आंदोलन : पांदण रस्त्यावरून शेतकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तालुक्यातील पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने संप्तत शेतकऱ्यांना घेऊन सातबारा शेतकरी पांदण रस्ता कृती समितीने सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात धरणे दिले. शेतकऱ्यांनी एसडीओंच्या दालनात बैलजोडी आणली होती. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.यावर्षी प्रचंड पावसाने मातीच्या पांदण रस्त्यांवर गाळ झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकविलेला माल घरी आणता आला नाही. परिणामी त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली गेली नाही. याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील, रोहयो, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती या विभागांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप कृती समिती पदाधिकाऱ्यांनी केला. या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन समितीने केले. यादरम्यान आंदोलकांनी थेट उदयसिंह राजपूत यांच्या दालनात बैलजोडी आणून संताप व्यक्त केला. आंदोलकांशी तहसीलदार संतोष काकडे यांनी चर्चा केली. यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, बाळकृष्ण धर्माळे, राजेंद्र उमेकर, राजू लोखंडे, समीर जवंजाळ, राजेश उमेकर, मनीष धुर्वे, सचिन अढाऊ, वैभव डवरे, सूर्यभान पारिसे, भीमराव मेश्राम, रवींद्र उमेकर, विजय बाकेकर, रवींद्र समरित, प्रभाकर गुल्हाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.प्रशासनाची तारांबळसातबारा, शेतकरी पांदण रस्ता कृती समितीने पांदण रस्त्यामुळे शेतकºयांच्या हालअपेष्टा कशा होत आहेत, याचे वास्तव चित्र तहसीलदार काकडे यांच्यासमोर मांडले. यादरम्यान भेटीसाठी शिष्टमंडळ उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जात असताना सोबत बैलजोडी घेऊन थेट दालनात पोहोचले. परिणामी येथे उपस्थित तहसिलदारासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :Farmerशेतकरी