शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मोबाईलचा विरंगुळा ठरतोय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:38 IST

अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे.

ठळक मुद्देतयारी दहावी-बारावीची टक्केवारीत घट झाल्याचा निष्कर्ष

मोहन राऊतअमरावती: अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे. हा मोह टाळून आगामी दोन महिने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवतोड मेहनत घ्यावी लागणार असल्याचा सूर बहुतांश पालकांमधून पुढे आला. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये टक्केवारीत घट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.निमित्त होते धामणगाव रेल्वेमधील आदर्श महाविद्यालयात आयोजित परिसंवादाचे. दररोज दिवस व रात्री अभ्यासादरम्यान विरंगुळा म्हणून दहा ते वीस मिनिटे अवधी मोबाइलचा वापर विद्यार्थ्यांकडून होतो. यामध्ये अधिकाधिक वेळ निघून जात असल्याचे परिसंवादात पुढे आले. यंदा बारावीत असलेले विद्यार्थी कधीपासून मोबाइल हाताळतात, असा प्रश्न पालकांना करण्यात आला असता, काही विद्यार्थी इयत्ता आठवीपासून, तर काही नववीपासून मोबाइल बाळगत असल्याचे पुढे आले. बहुतांश पालकांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्याला मोबाईल घेऊन दिल्याचे सांगितले.यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेची तयारी शिक्षक व पालक वर्ग विद्यार्थ्या$ंकडून करून घेतली जात आहे.

टक्केवारीत घटजे विद्यार्थी मोबाईल हाताळतात, ते दहावीमध्ये यशस्वी ठरले तरी ते यश व टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकून राहत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे दहावी ते बारावीदरम्यान वाढत्या वयानुसार मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात होतो. गुगलमधून काही पॉइंट सर्च करण्यासाठी पाल्य पालकांकडे मोबाइलचा हट्ट धरतो. अकरावीत घेतलेला मोबाइल बारावीच्या परीक्षेपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या जीवनाचा घटक बनतो. या मोबाइलमुळे दहावीत असलेली टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकत नाही, ही बाब परिसंवादातून पुढे आली.आजारांमध्ये वाढमोबाइलचा अधिक वापर केल्याने आणि काही विशिष्ट पद्धतीने वापर केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, एकाग्रता कमी होणे, नवीन शिकण्याची क्षमता कमी होणे, ग्रहणशक्ती कमी होणे, थकवा येणे, चक्कर येणे, मळमळणे तसेच पोट बिघडण्याचीही शक्यता हे परिणाम प्रामुख्याने दिसून येतात.अल्झायमर, मोतीबिंदूबारा वर्षांवरील मुलांना मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम्स खेळण्याच्या परिणामी अल्झायमरसारख्या आजारांचाही सामना लागू शकतो. विद्युत चुंबकीय लहरी सतत कानाच्या आसपास पोहोचत असल्याने केवळ कानच नाही, तर आसपासच्या अन्य पेशींवरही परिणाम होतो. तीव्र चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ व मोतीबिंदूसारखे विकाराचे रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत असल्याचा सूरदेखील परिसंवादातून निघाला.दहावी व बारावीत असताना मोबाइल वापरू नये. महत्त्वाचे काम असल्यास साधा मोबाइल वापरावा. मोबाइलच्या हव्यासामुळे परीक्षेत टक्केवारी घटत असल्याचा सूर परिसंवादातून पुढे आला आहे.डॉ. वाय.बी. गांडोळेप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे

टॅग्स :MobileमोबाइलEducationशिक्षण