शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सावधान! मोबाईलचा विरंगुळा ठरतोय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:38 IST

अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे.

ठळक मुद्देतयारी दहावी-बारावीची टक्केवारीत घट झाल्याचा निष्कर्ष

मोहन राऊतअमरावती: अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे. हा मोह टाळून आगामी दोन महिने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवतोड मेहनत घ्यावी लागणार असल्याचा सूर बहुतांश पालकांमधून पुढे आला. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये टक्केवारीत घट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.निमित्त होते धामणगाव रेल्वेमधील आदर्श महाविद्यालयात आयोजित परिसंवादाचे. दररोज दिवस व रात्री अभ्यासादरम्यान विरंगुळा म्हणून दहा ते वीस मिनिटे अवधी मोबाइलचा वापर विद्यार्थ्यांकडून होतो. यामध्ये अधिकाधिक वेळ निघून जात असल्याचे परिसंवादात पुढे आले. यंदा बारावीत असलेले विद्यार्थी कधीपासून मोबाइल हाताळतात, असा प्रश्न पालकांना करण्यात आला असता, काही विद्यार्थी इयत्ता आठवीपासून, तर काही नववीपासून मोबाइल बाळगत असल्याचे पुढे आले. बहुतांश पालकांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्याला मोबाईल घेऊन दिल्याचे सांगितले.यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेची तयारी शिक्षक व पालक वर्ग विद्यार्थ्या$ंकडून करून घेतली जात आहे.

टक्केवारीत घटजे विद्यार्थी मोबाईल हाताळतात, ते दहावीमध्ये यशस्वी ठरले तरी ते यश व टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकून राहत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे दहावी ते बारावीदरम्यान वाढत्या वयानुसार मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात होतो. गुगलमधून काही पॉइंट सर्च करण्यासाठी पाल्य पालकांकडे मोबाइलचा हट्ट धरतो. अकरावीत घेतलेला मोबाइल बारावीच्या परीक्षेपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या जीवनाचा घटक बनतो. या मोबाइलमुळे दहावीत असलेली टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकत नाही, ही बाब परिसंवादातून पुढे आली.आजारांमध्ये वाढमोबाइलचा अधिक वापर केल्याने आणि काही विशिष्ट पद्धतीने वापर केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, एकाग्रता कमी होणे, नवीन शिकण्याची क्षमता कमी होणे, ग्रहणशक्ती कमी होणे, थकवा येणे, चक्कर येणे, मळमळणे तसेच पोट बिघडण्याचीही शक्यता हे परिणाम प्रामुख्याने दिसून येतात.अल्झायमर, मोतीबिंदूबारा वर्षांवरील मुलांना मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम्स खेळण्याच्या परिणामी अल्झायमरसारख्या आजारांचाही सामना लागू शकतो. विद्युत चुंबकीय लहरी सतत कानाच्या आसपास पोहोचत असल्याने केवळ कानच नाही, तर आसपासच्या अन्य पेशींवरही परिणाम होतो. तीव्र चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ व मोतीबिंदूसारखे विकाराचे रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत असल्याचा सूरदेखील परिसंवादातून निघाला.दहावी व बारावीत असताना मोबाइल वापरू नये. महत्त्वाचे काम असल्यास साधा मोबाइल वापरावा. मोबाइलच्या हव्यासामुळे परीक्षेत टक्केवारी घटत असल्याचा सूर परिसंवादातून पुढे आला आहे.डॉ. वाय.बी. गांडोळेप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे

टॅग्स :MobileमोबाइलEducationशिक्षण