शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

भूविकास बँक कर्मचा-यांच्या लढा निर्णायक टप्प्यावर, हजारो कर्मचारी 45 महिन्यांपासून वेतनाविना, आमदार बच्चू कडू करणार नेतृत्व  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 5:44 PM

मागील ४५ महिन्यांपासून विनावेतन असलेल्या भूविकास बँक कर्मचा-यांनी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.

अमरावती : मागील ४५ महिन्यांपासून विनावेतन असलेल्या भूविकास बँक कर्मचा-यांनी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांनी नुकसानभरपाई व हक्काची ग्रॅज्युइटी मिळण्यासाठी आमदार बच्चू कडू यांना साद घातली असून, ते आता या लढ्याचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील जिल्हा भूविकास बँकांच्या २००८ मध्ये झालेल्या कर्जमाफीचा ७५० कोटींचा निधी मुंबई शिखर बँकेकडे वळता करण्यात आला. त्यानंतर २४ जुलै २०१५ रोजी एका आदेशाने या बँकाच शासनाने बंद करून टाकल्या व स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले. त्या कर्मचा-यांना मागील ४५ महिन्यांपासून वेतन व सेवानिवृत्त कर्मचा-यांना हक्काची ग्रॅज्युइटी मिळालेली नाही. या कर्मचा-यांची दैनावस्था झाली असताना, राज्य सरकारने ३०० कोटींच्या घरात असलेली देणी थांबविली आहे. जिल्हा भूविकास बँकेच्या कर्मचा-यांना सक्तीने स्वेच्छानिवृत्ती देऊन बँकेच्या ६० मालमत्ता विक्रीस शासनाने परवानगी दिली; मात्र ते संपादनही रखडले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूविकास बँकेची मालमत्ता संपादित करुन २९७ कोटी रुपये द्यावेत किंवा बँकेला एकमुस्त कर्ज परतफेड योजनेंतर्गंत झालेल्या ७१३ कोटी व्याजमाफीचे नुकसान जे शासन भरून देणार आहे. त्यातून ३०० कोटी अदा करावेत, अशी मागणी राज्यातील भूविकास बँक कर्मचा-यांनी केली आहे. भूविकास बँकेचा कर्मचारी मरणासन्न असताना शिखर बँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांचे मात्र चोचले पुरविले जात असल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान, भूविकास बँकेच्या कर्मचा-यांना जीवनमरणाचा प्रश्न संघटनेने आ. बच्चू कडू यांच्या कानावर घातला असून, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणार असल्याचे संकेत आहेत.

मागील दीड महिन्यांपासून रखडलेले वेतन, स्वेच्छा निवृत्तीचे लाभ मिळवून घेण्यासाठी संघटनेने अपक्ष आमदार बच्चू कडू यांना साद घातली आहे. बँक कर्मचारी आता मरणपंथाला पोहोचला आहे. - राजाभाऊ मुंजेवार, विदर्भ प्रमुख,  भूविकास बँक कर्मचारी महासंघ. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूbankबँकagitationआंदोलन