शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अमरावती विद्यापीठाला यूजीसीकडून जाहीर शुल्क धोरणाचा विसर; अभाविपचे प्र - कुलगुरूंना निवेदन

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2023 18:17 IST

अद्याप दिशादर्शक मार्गदर्शिकाच जाहीर नाही; विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड

अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचे शुल्क परतावा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास प्रक्रिया शुल्क म्हणून कमाल एक हजार रुपये वजा करून अन्य संपूर्ण शुल्काचा परतावा उच्च शिक्षण संस्थेने करणे बंधनकारक आहे. उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क आणि मूळ कागदपत्रे परत न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने देण्यात आलेला आहे. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने या धोरणाची अंमलबजावणी केली नसल्याने याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे.

३ जुलै २०२३ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत अधिकृत पत्र निर्गमित करूनही अद्यापपर्यंत याबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिशादर्शक मार्गदर्शिका जाहीर केलेल्या नाही, त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना नाहक मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती महानगराच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी विदर्भ प्रांत सहमंत्री समर्थ रागीट, अमरावती महानगर विद्यार्थी विस्तारक आदित्य बांते, अमरावती विभाग संयोजक अनुराग बालेकर अमरावती महानगर सहमंत्री रिया गुप्ते, अनिकेत पजई (स्वावलंबी भारत अभियान), राजेंद्र नाफडे, प्रा. अभिजित इंगळे, निखिल पवार उपस्थित होते. विद्यापीठाने याबाबत योग्य कार्यवाही न केल्यास विद्यार्थी हितासाठी आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठAmravatiअमरावती