शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अमरावती विद्यापीठाला यूजीसीकडून जाहीर शुल्क धोरणाचा विसर; अभाविपचे प्र - कुलगुरूंना निवेदन

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2023 18:17 IST

अद्याप दिशादर्शक मार्गदर्शिकाच जाहीर नाही; विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड

अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचे शुल्क परतावा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास प्रक्रिया शुल्क म्हणून कमाल एक हजार रुपये वजा करून अन्य संपूर्ण शुल्काचा परतावा उच्च शिक्षण संस्थेने करणे बंधनकारक आहे. उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क आणि मूळ कागदपत्रे परत न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने देण्यात आलेला आहे. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने या धोरणाची अंमलबजावणी केली नसल्याने याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे.

३ जुलै २०२३ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत अधिकृत पत्र निर्गमित करूनही अद्यापपर्यंत याबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिशादर्शक मार्गदर्शिका जाहीर केलेल्या नाही, त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना नाहक मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती महानगराच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी विदर्भ प्रांत सहमंत्री समर्थ रागीट, अमरावती महानगर विद्यार्थी विस्तारक आदित्य बांते, अमरावती विभाग संयोजक अनुराग बालेकर अमरावती महानगर सहमंत्री रिया गुप्ते, अनिकेत पजई (स्वावलंबी भारत अभियान), राजेंद्र नाफडे, प्रा. अभिजित इंगळे, निखिल पवार उपस्थित होते. विद्यापीठाने याबाबत योग्य कार्यवाही न केल्यास विद्यार्थी हितासाठी आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठAmravatiअमरावती