शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

अमरावती : तीन दिवसांत मागवला प्रपत्रासह संयुक्त अहवाल, विभागीय आयुक्तांना सूचना; अवकाळी, गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 3:50 PM

राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे.

अमरावती : राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे. महसूल विभागाचे यासंदर्भातील पत्र विभागीय आयुक्तांना सोमवारी उशिरा दिले. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिका-यांना सूचना देऊन अहवाल मागविला आहे.महसूल विभागाच्या पत्रानुसार, अवेळी पाऊस व गारपिटीमुळे पिके व फळपिकांच्या नुकसानाबाबत संयुक्त पंचनामे करून प्रपत्र अ, ब, क व ड मध्ये सविस्तर प्रस्ताव जिल्ह्यांद्वारा पाठविण्यात येणार आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानाबाबत ३३ ते ५० टक्के व ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची विगतवारी स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावी, अशा सूचना महसूल विभागाने केल्या आहेत. या दोन्ही प्रकारांतील नुकसानाचे स्वतंत्र प्रपत्र व संयुक्त सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीने करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे एकत्रित संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांच्या आत जिल्हाधिकाºयांनी मागविले आहेत. अमरावती विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला तसेच चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत, तर सोमवारी सायंकाळी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान झाले आता या नुकसानाचे युद्धस्तरावर पंचनामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी