शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

 अमरावती विभागात ८१३ गावे गारपिटीने बाधित, चार व्यक्तींसह १२ गुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:07 IST

विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला.

अमरावती - विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला. चार व्यक्ती जखमी झाले आहेत. मात्र, यंत्रणाद्वारा सर्वेक्षण अद्याप सुरू झालेले नाही. विभागात रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे सर्वाधिक ३८८ गावांमध्ये बुलडाणा जिल्ह्यात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात ३८४, अकोला ३१ व वाशिम जिल्ह्यात १० गावांमध्ये नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी नुकसान मात्र फारसे झालेले नसल्याचा अहवाल आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान रबीच्या गहु व हरभºयाचे झाले. शेतकºयांनी तुरीची सवंगणी करून ढीग लावले होते, ते ओले होऊन नुकसान झाले. झाडावरील कापूस ओला झाला. कांद्यासह भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. संत्र्याच्या मृग बहराची फळगळ झाली, तर आंबिया बहराचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पीकविमा कंपन्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्या आहेत. बाधित क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले असले तरी यंत्रणेद्वारा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येऊन नुकसानीचा अंदाज वर्तविला. मात्र, प्रत्यक्ष सर्वेक्षणाला अद्यापही सुरूवात झालेली नाही.

 तीन जणांचा मृत्यू  वाशिम जिल्ह्यात महागाव येतील यमुनाबाई हुंभाड (७५) बुलडाणा जिल्ह्यात गिरोली येथे निकिता राठोड (१६) अमरावती जिल्ह्यात नायगाव येथे गंगाधर राठोड (७३) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर बुलडाणा जिल्ह्यात वळती येथे रस्त्यावरील झाड अंगावर पडून ज्ञानगंगापूर येथील अजय महाले गंभीर जखमी झाल होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेहकर येथे दोन, संग्रामपूर येथे तीन, वरूड येथे सात अशा एकूण १२ गुरांचा वीज कोसळून मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती